शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

समाजवादी चळवळ मागे पडली

By admin | Updated: June 6, 2016 00:22 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. मात्र आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. समाजवादी विचारांचा प्रभाव ओसरत चालला आहे. अनेक प्रश्नांवर काम करण्यात चळवळ मागे पडली असल्याची खंत परिसंवादात व्यक्त करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘देशापुढील आव्हाने आणि राष्ट्र सेवा दलाची अपरिहार्यता’ या विषयावर रविवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अ‍ॅड. सुरेखा दळवी, कॉम्रेड संजय दाभाडे, आमदार कपिल पाटील, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. डॉ. अभिजीत वैद्य अध्यक्षस्थानी होते.अ‍ॅड. दळवी म्हणाल्या, ‘अहिंसा, सत्यामध्ये ताकद आहे. पण, समाजवादी विचारांचा प्रभाव पडत नाही. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांपर्यंत आजही आपण पोहचू शकलो नाही. याचे विवेचन करण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थितीने निर्माण झालेल्या धोरणांचे आव्हान आजही आपल्यासमोर आहे. सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले हातपाय पसरत आहे. जातीचे राजकारण वाढत आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतरची अस्वस्थता आजही दिसून येत आहे. देशात विषमता, द्वेष भावना शिल्लक आहे तोपर्यंत राष्ट्र सेवा दलाची गरज आहे.’’दाभाडे म्हणाले, भांडवलशाहीचे मोठे आव्हान आहे. फॅसिझम आकाराला येऊ लागले आहे. विचार आणि संघटन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. समाजवादी दिशेने आगेकूच करण्याची जबाबदारी सेवा दलाने घेतली आहे. आर्थिक धोरणांमुळे जी परिस्थिती आलीय त्याला कसे सामोरे जाणार आहोत. आव्हानांचा सामना करत सेवा दल निभावून पुढे जाईल.पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कमजोर वीणेवर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना केलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. (प्रतिनिधी)