शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी चळवळ मागे पडली

By admin | Updated: June 6, 2016 00:22 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना करण्यात आलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. मात्र आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. समाजवादी विचारांचा प्रभाव ओसरत चालला आहे. अनेक प्रश्नांवर काम करण्यात चळवळ मागे पडली असल्याची खंत परिसंवादात व्यक्त करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘देशापुढील आव्हाने आणि राष्ट्र सेवा दलाची अपरिहार्यता’ या विषयावर रविवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अ‍ॅड. सुरेखा दळवी, कॉम्रेड संजय दाभाडे, आमदार कपिल पाटील, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. डॉ. अभिजीत वैद्य अध्यक्षस्थानी होते.अ‍ॅड. दळवी म्हणाल्या, ‘अहिंसा, सत्यामध्ये ताकद आहे. पण, समाजवादी विचारांचा प्रभाव पडत नाही. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांपर्यंत आजही आपण पोहचू शकलो नाही. याचे विवेचन करण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थितीने निर्माण झालेल्या धोरणांचे आव्हान आजही आपल्यासमोर आहे. सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले हातपाय पसरत आहे. जातीचे राजकारण वाढत आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतरची अस्वस्थता आजही दिसून येत आहे. देशात विषमता, द्वेष भावना शिल्लक आहे तोपर्यंत राष्ट्र सेवा दलाची गरज आहे.’’दाभाडे म्हणाले, भांडवलशाहीचे मोठे आव्हान आहे. फॅसिझम आकाराला येऊ लागले आहे. विचार आणि संघटन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. समाजवादी दिशेने आगेकूच करण्याची जबाबदारी सेवा दलाने घेतली आहे. आर्थिक धोरणांमुळे जी परिस्थिती आलीय त्याला कसे सामोरे जाणार आहोत. आव्हानांचा सामना करत सेवा दल निभावून पुढे जाईल.पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कमजोर वीणेवर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दलाची स्थापना केलेली नाही. ज्या मुद्द्यांवर लढायचे आहे, ते मुद्दे येत नाहीत. आपापसात भांडणे खूप आहेत. एकत्रित येत नाही. आपल्यातील भांडणे ही मतभेदाची नाहीत, तर मनभेदाची आहेत. (प्रतिनिधी)