शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

By admin | Updated: October 15, 2015 01:11 IST

महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना

पुणे : महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना, एखादा गंभीर प्रसंग निर्माण झाल्यावर महिला अधिकारी कार्यालय अथवा फिल्डवर अधिक सक्षमपणे काम करतात. त्यामुळे महिलांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर कोणत्या पदावर आहे, याला महत्त्व राहत नाही, असे मत महिला शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांनी येथे व्यक्त केले.नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत बुधवारी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, जीवन प्राधिकरण, कोषागार विभागातील महिला अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील आव्हाने, पुरुष मानसिकतेत होत असलेला बदल, समाजात काम करताना येणाऱ्या अडचणी, अधिकारीपदावर असताना कार्यालय आणि घर या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी कसरत आणि या दोन्ही ठिकाणी स्वत:ला सुपरवुमन म्हणून सिद्ध करण्याची धडपड या विषयांवर सर्वच महिला अधिकाऱ्यांनी मनमोकळेपणे आपली मते मांडली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. अनेकदा क्षमता असूनही ‘की’ पोस्टवर डावलले जाणे, बदल्यांमुळे कुटुंबाची हेळसांड याचबरोबर खासगीच्या तुलनेत असलेले सुरक्षित वातावरण, वरिष्ठ अधिकारी व पुरुष कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेला पाठिंबा, समाजाचा बदलता दृष्टिकोन यामुळे शिक्षक व डॉक्टर या चौकटीच्या बाहेर पडून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक मत महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.स्त्री-पुरुष समानतेपेक्षा समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज आहे. कार्यालयामध्ये एक कार्यक्षम व सक्षम अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे अन् दुसरीकडे गृहदक्ष स्त्रीची जबाबदारी देखील निभावताना अनेकदा महिला अधिकाऱ्यांची फरफट होते. एकाच वेळी विविध पातळ्यांवर ‘ती’ लढत असल्याने अनेक वेळा तिची मानसिक व शारीरिक घुसमट होते.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशाखा समित्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत झाली आहे. कार्यालयामध्ये पुरुष सहकाऱ्याकडून काही त्रास झाल्यावर तक्रार करण्यासाठी कोणताही फोरम नव्हता; पण विशाखा समित्यामुळे आता किमान तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत. समितीकडे तक्रार आल्यानंतर कारवाई होते हे कळल्यानेच महिलांची छेडछाड कमी झाली आहे.- उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (मनपा)