शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

By admin | Updated: October 15, 2015 01:11 IST

महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना

पुणे : महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना, एखादा गंभीर प्रसंग निर्माण झाल्यावर महिला अधिकारी कार्यालय अथवा फिल्डवर अधिक सक्षमपणे काम करतात. त्यामुळे महिलांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर कोणत्या पदावर आहे, याला महत्त्व राहत नाही, असे मत महिला शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांनी येथे व्यक्त केले.नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत बुधवारी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, जीवन प्राधिकरण, कोषागार विभागातील महिला अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील आव्हाने, पुरुष मानसिकतेत होत असलेला बदल, समाजात काम करताना येणाऱ्या अडचणी, अधिकारीपदावर असताना कार्यालय आणि घर या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी कसरत आणि या दोन्ही ठिकाणी स्वत:ला सुपरवुमन म्हणून सिद्ध करण्याची धडपड या विषयांवर सर्वच महिला अधिकाऱ्यांनी मनमोकळेपणे आपली मते मांडली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. अनेकदा क्षमता असूनही ‘की’ पोस्टवर डावलले जाणे, बदल्यांमुळे कुटुंबाची हेळसांड याचबरोबर खासगीच्या तुलनेत असलेले सुरक्षित वातावरण, वरिष्ठ अधिकारी व पुरुष कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेला पाठिंबा, समाजाचा बदलता दृष्टिकोन यामुळे शिक्षक व डॉक्टर या चौकटीच्या बाहेर पडून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक मत महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.स्त्री-पुरुष समानतेपेक्षा समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज आहे. कार्यालयामध्ये एक कार्यक्षम व सक्षम अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे अन् दुसरीकडे गृहदक्ष स्त्रीची जबाबदारी देखील निभावताना अनेकदा महिला अधिकाऱ्यांची फरफट होते. एकाच वेळी विविध पातळ्यांवर ‘ती’ लढत असल्याने अनेक वेळा तिची मानसिक व शारीरिक घुसमट होते.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशाखा समित्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत झाली आहे. कार्यालयामध्ये पुरुष सहकाऱ्याकडून काही त्रास झाल्यावर तक्रार करण्यासाठी कोणताही फोरम नव्हता; पण विशाखा समित्यामुळे आता किमान तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत. समितीकडे तक्रार आल्यानंतर कारवाई होते हे कळल्यानेच महिलांची छेडछाड कमी झाली आहे.- उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (मनपा)