शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या निर्यात कोटा वाढीचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होऊनही केंद्र सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होऊनही केंद्र सरकार त्यावर निर्णय घेत नाही. दुसरीकडे साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि खपाला उठाव नसल्याने देशभरातील साखर कारखाने त्रस्त झाले आहेत.

ऊस उत्पादकांचे पैसे देणे कारखान्यांना अडचणीचे होऊ लागले आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज २०० लाख टनांची आहे. यंदा साखरेचे देशातील उत्पादन ३०० लाख टनांपुढे गेले आहे. मागील वर्षाची शिल्लक साखर सुमारे १०० टन आहे. एकट्या महाराष्ट्राचे यंदाचे उत्पादन १०६ लाख टन आहे. महाराष्ट्रातही गेल्या वर्षीची ४५ लाख टन साखर शिल्लक आहे.

यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली. मात्र, सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. देशातील कारखान्यांना केंद्राने यंदासाठी निर्यातीचा ६० लाख टन कोटा विभागून दिला आहे. हे निर्यात करार साखर कारखान्यांनी यंदा करूनही टाकले. त्यामुळे निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकार निर्यात साखरेला एका टनाला ६ हजार रुपये अनुदान देते. परदेशात साखर कमी भावाने पाठवावी लागते. त्यात कारखान्यांचा तोटा होतो. त्यामुळे अनुदान दिले जाते. याच कारणाने केंद्र सरकार कोटा वाढवून देण्याचा निर्णय घेत नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारात साखर निर्यातीला सरकारची परवानगी आहे. मात्र, उत्पादन खर्च व खुल्या बाजारातील भाव यात तफावत असल्याने कारखान्यांना ते परवडत नाही. त्यामुळेच निर्यातीचा अनुदानित कोटा वाढवून देण्याची मागणी साखर कारखानदार करत आहेत.

चौकट

त्वरित निर्णय अपेक्षित

निर्यात कोटा वाढवण्याची गरज आहे. यावर वास्तविक त्वरेने निर्णय होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व देशातही साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे.

-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

चौकट

तोडग्याचे प्रयत्न चालू

निर्यातीचे कोट्याइतके करार झाले आहेत. कोटा वाढवला तर त्यावर अनुदान द्यावे लागेल व कारखान्यांनी खुल्या बाजारात विक्री करायची ठरवले तर ते परवडणार नाही, या द्विधा अवस्थेत साखर उद्योग आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र