शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या निर्यात कोटा वाढीचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होऊनही केंद्र सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होऊनही केंद्र सरकार त्यावर निर्णय घेत नाही. दुसरीकडे साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि खपाला उठाव नसल्याने देशभरातील साखर कारखाने त्रस्त झाले आहेत.

ऊस उत्पादकांचे पैसे देणे कारखान्यांना अडचणीचे होऊ लागले आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज २०० लाख टनांची आहे. यंदा साखरेचे देशातील उत्पादन ३०० लाख टनांपुढे गेले आहे. मागील वर्षाची शिल्लक साखर सुमारे १०० टन आहे. एकट्या महाराष्ट्राचे यंदाचे उत्पादन १०६ लाख टन आहे. महाराष्ट्रातही गेल्या वर्षीची ४५ लाख टन साखर शिल्लक आहे.

यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली. मात्र, सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. देशातील कारखान्यांना केंद्राने यंदासाठी निर्यातीचा ६० लाख टन कोटा विभागून दिला आहे. हे निर्यात करार साखर कारखान्यांनी यंदा करूनही टाकले. त्यामुळे निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकार निर्यात साखरेला एका टनाला ६ हजार रुपये अनुदान देते. परदेशात साखर कमी भावाने पाठवावी लागते. त्यात कारखान्यांचा तोटा होतो. त्यामुळे अनुदान दिले जाते. याच कारणाने केंद्र सरकार कोटा वाढवून देण्याचा निर्णय घेत नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारात साखर निर्यातीला सरकारची परवानगी आहे. मात्र, उत्पादन खर्च व खुल्या बाजारातील भाव यात तफावत असल्याने कारखान्यांना ते परवडत नाही. त्यामुळेच निर्यातीचा अनुदानित कोटा वाढवून देण्याची मागणी साखर कारखानदार करत आहेत.

चौकट

त्वरित निर्णय अपेक्षित

निर्यात कोटा वाढवण्याची गरज आहे. यावर वास्तविक त्वरेने निर्णय होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व देशातही साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे.

-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

चौकट

तोडग्याचे प्रयत्न चालू

निर्यातीचे कोट्याइतके करार झाले आहेत. कोटा वाढवला तर त्यावर अनुदान द्यावे लागेल व कारखान्यांनी खुल्या बाजारात विक्री करायची ठरवले तर ते परवडणार नाही, या द्विधा अवस्थेत साखर उद्योग आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र