शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

साखरेच्या निर्यात कोटा वाढीचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होऊनही केंद्र सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखरेच्या निर्यात कोट्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होऊनही केंद्र सरकार त्यावर निर्णय घेत नाही. दुसरीकडे साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि खपाला उठाव नसल्याने देशभरातील साखर कारखाने त्रस्त झाले आहेत.

ऊस उत्पादकांचे पैसे देणे कारखान्यांना अडचणीचे होऊ लागले आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज २०० लाख टनांची आहे. यंदा साखरेचे देशातील उत्पादन ३०० लाख टनांपुढे गेले आहे. मागील वर्षाची शिल्लक साखर सुमारे १०० टन आहे. एकट्या महाराष्ट्राचे यंदाचे उत्पादन १०६ लाख टन आहे. महाराष्ट्रातही गेल्या वर्षीची ४५ लाख टन साखर शिल्लक आहे.

यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली. मात्र, सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. देशातील कारखान्यांना केंद्राने यंदासाठी निर्यातीचा ६० लाख टन कोटा विभागून दिला आहे. हे निर्यात करार साखर कारखान्यांनी यंदा करूनही टाकले. त्यामुळे निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकार निर्यात साखरेला एका टनाला ६ हजार रुपये अनुदान देते. परदेशात साखर कमी भावाने पाठवावी लागते. त्यात कारखान्यांचा तोटा होतो. त्यामुळे अनुदान दिले जाते. याच कारणाने केंद्र सरकार कोटा वाढवून देण्याचा निर्णय घेत नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारात साखर निर्यातीला सरकारची परवानगी आहे. मात्र, उत्पादन खर्च व खुल्या बाजारातील भाव यात तफावत असल्याने कारखान्यांना ते परवडत नाही. त्यामुळेच निर्यातीचा अनुदानित कोटा वाढवून देण्याची मागणी साखर कारखानदार करत आहेत.

चौकट

त्वरित निर्णय अपेक्षित

निर्यात कोटा वाढवण्याची गरज आहे. यावर वास्तविक त्वरेने निर्णय होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व देशातही साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे.

-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

चौकट

तोडग्याचे प्रयत्न चालू

निर्यातीचे कोट्याइतके करार झाले आहेत. कोटा वाढवला तर त्यावर अनुदान द्यावे लागेल व कारखान्यांनी खुल्या बाजारात विक्री करायची ठरवले तर ते परवडणार नाही, या द्विधा अवस्थेत साखर उद्योग आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र