शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

...तर सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना मुंबई-पुण्यात जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST

-- इंदापूर : राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरमधील काही लोकप्रतिनिधी, चुकीचा आरोप करून बदनाम करत ...

--

इंदापूर : राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोलापूरमधील काही लोकप्रतिनिधी, चुकीचा आरोप करून बदनाम करत आहेत. पालकमंत्री पदावरून हटवण्यासाठी कुटील कारस्थाने करत आहेत. परंतु पालकमंत्री भरणे यांना धमक्या दिल्यास सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना पुणे जिल्ह्यातील हद्दीतून पुणे-मुंबईकडे जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील २२ गावे व खडकवासला कॅनॉलमध्ये ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेस सरकारने मान्यता दिली. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यांना धरणग्रस्त शेतकऱ्यांचा वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध मागण्या करत उपविभागीय अभियंता, भीमा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक ४ पळसदेव, येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी सोनावणे बोलत होते.

याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र संघटक अनिल खोत, तेजपृथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात, विकास भोसले, अभिजित गायकवाड, संपत पुणेकर, वैभव भोसले, नीलेश भोसले, माऊली सोनवणे, अजित भोसले, आकाश भोसले आदी उपस्थित होते

सोनवणे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांनी, उजनी धरणातून मराठवाडा, लातूरसाठी केलेली पाणी तरतूद रद्द करण्याची मागणी करावी. तसेच सोलापूर जिल्ह्यात, धरणग्रस्तांना किती जमिनी मिळाल्या याची वस्तुस्थिती काय? याची माहिती मिळावी. तसेच धरणग्रस्तांवर अन्याय करणारे शेतकरी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली.

सोलापूर जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८५ टीएमसी पाणी वापरले. परंतु धरणग्रस्तांना त्या मानाने पाणी वापरासाठी कमी मिळत आहे. तसेच दहा टीएमसी पाणी धरणग्रस्तांना मिळाले पाहिजे व लातूर मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाण्याची केलेली तरतूद रद्द करावी. सध्या ७ टीएमसी पाणी दिले जाते ते बंद करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या नगरपालिका यांना पाणी देण्याच्या नावाखाली जवळपास २५ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून जाते. त्यावेळी कोणीही काही बोलत नाही, मात्र ज्यांच्या हजारो हेक्टर जमिनी उजनी धरणात गेल्या त्या धरणग्रस्तांना हक्काचे पाणी मिळाल्यामुळे, सोलापूरच्या राजकारन्यांच्या पोटात गोळा आला आहे, असाही आरोप संजय सोनवणे यांनी केला आहे.

--

फोटो क्रमाक - १३इंदापूर धरणग्रस्त

फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे आंदोलन करताना धरणग्रस्त शेतकरी.