शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गावर वाजणार सायरन

By admin | Updated: June 14, 2016 04:48 IST

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित व्हावे यासाठी बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सायरन बसविण्यात

पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित व्हावे यासाठी बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सायरन बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मार्गावर गतिरोधक, बोर्ड बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.नगर रस्ता बीआरटी मार्गाचे उद्घाटन होऊन ती कार्यान्वित झाल्यानंतर तिथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बीआरटी मार्ग सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जगताप यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी बीआरटीची बैठक झाली. या वेळी पीएमपी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अभिषेक कृष्णा, महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मयुरा शिंदेकर उपस्थित होत्या. प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘बीआरटी मार्गावर गतिरोधक उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. बेंगळुरूच्या धर्तीवर बीआरटी मार्गावर तीन ठिकाणी पादचाऱ्यांसाठी सायरन बसविला जाणार आहे. हे सायरन सिग्नलला जोडले जाणार आहेत. पादचारी रस्ता ओलांडत असताना हा सायरन वाजणार आहे. बीआरटी मार्गावरील रोलिंगची उंची वाढविली जात आहे. या मार्गावरील उर्वरित कामांसाठी निधी मिळावा याकरिता स्थायी समितीमध्ये ठराव मांडण्यात आला आहे.’’ प्रशासनाकडून बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या मार्गावरील वाहतूक पोलीस आणि वॉर्डनसंख्या वाढविण्यात आली आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहने घुसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे.बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. नगर बीआरटी मार्ग सुरु होण्याआधीपासून आणि आता सुरु झाल्यानंतरही चर्चेचा मुद्दा राहिला आहे. कधी अपघातांमुळे तर कधी त्रुटींमुळे नगर बीआरटी मार्ग चर्चेत आहे. गेल्या महिनाभरापासून बीआरटी मार्गात झालेल्या अपघातांमुळे काही नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून बीआरटी मार्गावरून टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने बीआरटी मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सायरनची योजना राबविण्यात येणार आहे.