शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गावर वाजणार सायरन

By admin | Updated: June 14, 2016 04:48 IST

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित व्हावे यासाठी बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सायरन बसविण्यात

पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित व्हावे यासाठी बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सायरन बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मार्गावर गतिरोधक, बोर्ड बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.नगर रस्ता बीआरटी मार्गाचे उद्घाटन होऊन ती कार्यान्वित झाल्यानंतर तिथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बीआरटी मार्ग सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जगताप यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी बीआरटीची बैठक झाली. या वेळी पीएमपी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अभिषेक कृष्णा, महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मयुरा शिंदेकर उपस्थित होत्या. प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘बीआरटी मार्गावर गतिरोधक उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. बेंगळुरूच्या धर्तीवर बीआरटी मार्गावर तीन ठिकाणी पादचाऱ्यांसाठी सायरन बसविला जाणार आहे. हे सायरन सिग्नलला जोडले जाणार आहेत. पादचारी रस्ता ओलांडत असताना हा सायरन वाजणार आहे. बीआरटी मार्गावरील रोलिंगची उंची वाढविली जात आहे. या मार्गावरील उर्वरित कामांसाठी निधी मिळावा याकरिता स्थायी समितीमध्ये ठराव मांडण्यात आला आहे.’’ प्रशासनाकडून बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या मार्गावरील वाहतूक पोलीस आणि वॉर्डनसंख्या वाढविण्यात आली आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहने घुसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे.बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. नगर बीआरटी मार्ग सुरु होण्याआधीपासून आणि आता सुरु झाल्यानंतरही चर्चेचा मुद्दा राहिला आहे. कधी अपघातांमुळे तर कधी त्रुटींमुळे नगर बीआरटी मार्ग चर्चेत आहे. गेल्या महिनाभरापासून बीआरटी मार्गात झालेल्या अपघातांमुळे काही नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून बीआरटी मार्गावरून टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने बीआरटी मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सायरनची योजना राबविण्यात येणार आहे.