शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

निनाद देशमुख अभ्यास किती वेळ करता यापेक्षा अभ्यास कसा आणि किती चांगला करता, यावर यूपीएससीच्या परीक्षेतील यश अवलंबून असते. ...

निनाद देशमुख

अभ्यास किती वेळ करता यापेक्षा अभ्यास कसा आणि किती चांगला करता, यावर यूपीएससीच्या परीक्षेतील यश अवलंबून असते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मी क्लास लावले होते. मात्र, त्यातून काही साध्य होणार नाही हे उमगल्याने स्व-अध्ययनावर मी भर दिला. दिवसभर काम करत होतो. त्यानंतर रात्री १ ते २ पर्यंत अभ्यास करायचो. कुठलेही यश मिळाले तर त्याने हुरळून न जाता येणाऱ्या पदाची जबाबदारी ओळखून आणखी चांगले काम करावे, असा मोलाचा सल्ला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) आयुष प्रसाद देतात. २०१५ ला संपूर्ण देशात २४ वी रँक मिळवत आयएएस झालेले आयुष प्रसाद यांची निवड महाराष्ट्र केडरमध्ये झाली आहे. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

आयुष प्रसाद हे मूळचे झारखंड राज्यातील रांची येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटक राज्यात झाले. तर दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. बी.ई. मॅकेनिकल शाखेत त्यांनी पदवी शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. विशेष म्हणजे, त्यांचे आई आणि वडील हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आहेत. त्यांचे वडील कर्नाटकचे डीजीपी होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे, तर आई आयएएस अधिकारी असून त्या कर्नाटकच्या अप्पर सचिव आहेत. या यशात आईवडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे आयुष प्रसाद सांगतात.

पूर्व परीक्षा : संपूर्ण परीक्षेच्या अभ्यासक्रमाची यादी बनवत तो आधी पूर्णपणे समजून घ्यावा. अभ्यासक्रम पूर्ण संपवावा. दोन विषयांमधील संबंध समजून घ्यावे. कुठल्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान असायला हवे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रसंगावधान महत्त्वाचे आहे. पूर्व परीक्षेत येणारे बहुपर्यायी प्रश्न हे गोंधळात टाकणारे असतात. यामुळे योग्य पर्याय निवडणे हे महत्त्वाचे असते. गोंधळ होऊ न देता योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य प्रकारचा सराव हा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो.

मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेसाठी उत्तरे लिहिण्याचा सराव महत्त्वाचा आहे. तुमचे उत्तरे हे ‘टू द पॉईंट’असणे गरजेचे आहेत. त्या सोबतच विश्लेषणात्मक आणि सर्व प्रकारच्या बाजू मांडणारे हवेत. तुम्ही लिहिलेली उत्तरे ही व्यवस्थित आणि पद्धतशीर असायला हवी.

निबंध : तुमचा निबंध वेगळा कसा असेल यावर भर द्या. निबंधाच्या विषयाची पूर्ण माहिती असायला हवी. निबंधाचा गोषवारा, विषय परिचय, मजकूर आणि निष्कर्ष हा स्पष्ट असावा. निबंध लिहिण्याचा सराव वारंवार करा. यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.

मुलाखत : मुलाखत देताना स्पष्ट आणि थेट बोलावे. बोलताना आपल्यातील आत्मविश्वास हा मुलाखत घेणाऱ्यांना दिसावा. यासाठी सातत्याने सराव करावा लागेल. मुलाखत कोणत्याही भाषेत देता येते. यामुळे भाषा येत नसल्याची भीती बाळगू नका. आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे बारकावे आपल्याला माहिती असायला हवेत.

फोटो : आयुष प्रसाद