शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

निनाद देशमुख अभ्यास किती वेळ करता यापेक्षा अभ्यास कसा आणि किती चांगला करता, यावर यूपीएससीच्या परीक्षेतील यश अवलंबून असते. ...

निनाद देशमुख

अभ्यास किती वेळ करता यापेक्षा अभ्यास कसा आणि किती चांगला करता, यावर यूपीएससीच्या परीक्षेतील यश अवलंबून असते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मी क्लास लावले होते. मात्र, त्यातून काही साध्य होणार नाही हे उमगल्याने स्व-अध्ययनावर मी भर दिला. दिवसभर काम करत होतो. त्यानंतर रात्री १ ते २ पर्यंत अभ्यास करायचो. कुठलेही यश मिळाले तर त्याने हुरळून न जाता येणाऱ्या पदाची जबाबदारी ओळखून आणखी चांगले काम करावे, असा मोलाचा सल्ला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) आयुष प्रसाद देतात. २०१५ ला संपूर्ण देशात २४ वी रँक मिळवत आयएएस झालेले आयुष प्रसाद यांची निवड महाराष्ट्र केडरमध्ये झाली आहे. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

आयुष प्रसाद हे मूळचे झारखंड राज्यातील रांची येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटक राज्यात झाले. तर दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. बी.ई. मॅकेनिकल शाखेत त्यांनी पदवी शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. विशेष म्हणजे, त्यांचे आई आणि वडील हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आहेत. त्यांचे वडील कर्नाटकचे डीजीपी होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे, तर आई आयएएस अधिकारी असून त्या कर्नाटकच्या अप्पर सचिव आहेत. या यशात आईवडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे आयुष प्रसाद सांगतात.

पूर्व परीक्षा : संपूर्ण परीक्षेच्या अभ्यासक्रमाची यादी बनवत तो आधी पूर्णपणे समजून घ्यावा. अभ्यासक्रम पूर्ण संपवावा. दोन विषयांमधील संबंध समजून घ्यावे. कुठल्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान असायला हवे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रसंगावधान महत्त्वाचे आहे. पूर्व परीक्षेत येणारे बहुपर्यायी प्रश्न हे गोंधळात टाकणारे असतात. यामुळे योग्य पर्याय निवडणे हे महत्त्वाचे असते. गोंधळ होऊ न देता योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य प्रकारचा सराव हा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो.

मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेसाठी उत्तरे लिहिण्याचा सराव महत्त्वाचा आहे. तुमचे उत्तरे हे ‘टू द पॉईंट’असणे गरजेचे आहेत. त्या सोबतच विश्लेषणात्मक आणि सर्व प्रकारच्या बाजू मांडणारे हवेत. तुम्ही लिहिलेली उत्तरे ही व्यवस्थित आणि पद्धतशीर असायला हवी.

निबंध : तुमचा निबंध वेगळा कसा असेल यावर भर द्या. निबंधाच्या विषयाची पूर्ण माहिती असायला हवी. निबंधाचा गोषवारा, विषय परिचय, मजकूर आणि निष्कर्ष हा स्पष्ट असावा. निबंध लिहिण्याचा सराव वारंवार करा. यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.

मुलाखत : मुलाखत देताना स्पष्ट आणि थेट बोलावे. बोलताना आपल्यातील आत्मविश्वास हा मुलाखत घेणाऱ्यांना दिसावा. यासाठी सातत्याने सराव करावा लागेल. मुलाखत कोणत्याही भाषेत देता येते. यामुळे भाषा येत नसल्याची भीती बाळगू नका. आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे बारकावे आपल्याला माहिती असायला हवेत.

फोटो : आयुष प्रसाद