शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

साधेपणाने विवाह केल्याने पैशांची होतेय मोठी बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीमुळे मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना आपत्तीमुळे मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा मोठा परिणाम लग्नसमारंभ घटण्यावर झाला असला तरी, गेल्या १४ महिन्यांच्या काळात काहींनी साधेपणाने लग्नसमारंभ करण्यास मोठी पसंती दिली.

मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व साधेपणाने लग्नसमारंभ केल्यास लाखो रुपयांची बचत होतीच; पण हीच लाखो रुपयांची रक्कम त्या दाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी एक ठेव म्हणूनही जमा करता आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

विवाह नोंदणी संस्थेकडे असलेल्या नोंदणीनुसार मार्च, २०२० पासून डिसेंबर, २०२० पर्यंत शहरात ३८०० तर जानेवारी २०२१ ते मार्च, २०२१ पर्यंत २ हजार ३१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत़

दरम्यान पुणे महापालिकेकडे साधारणत: दरवर्षी पाच हजारांच्या आसपास विवाह नोंदणी प्रमाणपत्रे दिली जातात; परंतु या दोन वर्षांच्या काळात अनेकांनी अद्यापही विवाह नोंदणी केली नसल्याने, शहरात निश्चित किती विवाह झाले याची आकडेवारी स्पष्ट होत नाही. त्यातच अनेक क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील कर्मचारी वर्ग हा कोविड-१९ च्या कामात व्यस्त असल्याने हे नोंदणीचे कामही वर्षभर थांबले गेले आहे. तर जी नोंदणी झाली आहे, तिचे प्रमाणही खूपच कमी आहे.

---------------

चौकट १

शहरातील जन्म-मृत्यू नोंदणीची जानेवारी २०१९ पासूनची आकडेवारी पाहता जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कोरोना आपत्तीतही जास्तच राहिला आहे. सन २०२० मध्ये वर्षभरात ५० हजार ५४४ जणांचा जन्म झाल्याची नोंद आहे. तर याच काळात ३८ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे साधारणत: १२ हजाराने मृत्यूपेक्षा जन्माची संख्या ही जास्तच आहे़

----------------

वर्ष जन्म मृत्यू

२०१९ ५२,६६९ ३२,३५३

२०२० ५०,५४४ ३८,१९४

--------------------

चौकट १

कोरोना आपत्तीमुळे सप्टेंबर, २०२० अखेर रखडलेले लग्नसमारंभ कोरोना संसर्ग ओसरल्याने, नोव्हेंबर, २०२० पासून पुन्हा सुरू झाले. डिसेंबर, २०२०, जानेवारी ते फेब्रवारी २०२१ पर्यंत लग्न समारंभांना शासनाने १०० जणांच्या उपस्थितीचे बंधनही कायम ठेवले होते; परंतु ते अनेकांनी न पाळल्याने व त्यातच मार्च, २०२१ पासून पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याने, लग्न समारंभांवर मोठ्या प्रमाणात बंधने आली. २५ लोकांच्या उपस्थितीतच लग्नसमारंभ पार पाडण्याचा आदेश शासनाने दिला़. परिणामी या काळात होणारे नियोजित लग्नसमारंभ पुढे ढकलली गेली आहे.

----------------------------------