शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शर्यतबंदी उठविण्याची चिन्हे!

By admin | Updated: June 15, 2014 04:05 IST

बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा

पुणे : बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा, या प्रमुख मागणीसाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडामालकांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जावडेकर यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्व मदत करणार असल्याचे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला.जावडेकर यांच्याशी चर्चा करताना खासदार आढळराव-पाटील यांनी निदर्शनास आणून दिले, की १९९१मध्ये राजपत्रात कुत्रा या पाळीव प्राण्याचा समावेश केला होता. त्याविरोधात इंडियन सर्कल संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले. न्यायालयाने कुत्रा हा शब्द राजपत्रातून वगळावा, असा निर्णय दिला. बैल हादेखील पाळीव प्राणी असूनही जंगली प्राण्यांच्या यादीत समावेश करणे सर्वथा चुकीचे असल्याने बैल हा पाळीव प्राणी सदर राजपत्रातून वगळावा, अशी विनंती केली. या वेळी माजी आमदार बाबूराव पाचार्णे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर, खासदार आढळराव-पाटील, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंगशेठ एरंडे, पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. अमृता गुरव, संदीप बोदगे, अण्णा भेगडे, भानुदास लांडगे, सागर शेलार, रामभाऊ सासवडे, मुकुंद बोऱ्हाडे, राजेंद्र टाकळकर, संतोष भोसले, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र दिंडोरे, संदेश आल्हाट, दत्ता गिलबिले, संदीप मोरे, अमोल हरपळे, करण जाधव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)