शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शर्यतबंदी उठविण्याची चिन्हे!

By admin | Updated: June 15, 2014 04:05 IST

बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा

पुणे : बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा, या प्रमुख मागणीसाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडामालकांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जावडेकर यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्व मदत करणार असल्याचे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला.जावडेकर यांच्याशी चर्चा करताना खासदार आढळराव-पाटील यांनी निदर्शनास आणून दिले, की १९९१मध्ये राजपत्रात कुत्रा या पाळीव प्राण्याचा समावेश केला होता. त्याविरोधात इंडियन सर्कल संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले. न्यायालयाने कुत्रा हा शब्द राजपत्रातून वगळावा, असा निर्णय दिला. बैल हादेखील पाळीव प्राणी असूनही जंगली प्राण्यांच्या यादीत समावेश करणे सर्वथा चुकीचे असल्याने बैल हा पाळीव प्राणी सदर राजपत्रातून वगळावा, अशी विनंती केली. या वेळी माजी आमदार बाबूराव पाचार्णे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर, खासदार आढळराव-पाटील, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंगशेठ एरंडे, पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. अमृता गुरव, संदीप बोदगे, अण्णा भेगडे, भानुदास लांडगे, सागर शेलार, रामभाऊ सासवडे, मुकुंद बोऱ्हाडे, राजेंद्र टाकळकर, संतोष भोसले, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र दिंडोरे, संदेश आल्हाट, दत्ता गिलबिले, संदीप मोरे, अमोल हरपळे, करण जाधव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)