शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

आजार.... शत्रू ? नव्हे, ‘मित्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

लोगो - मन करा रे प्रसन्न कोणताही आजार, विकार हा मुळात आपला शत्रू नसतोच, उलट त्याचे आपल्यावर उपकारच होतात. ...

लोगो - मन करा रे प्रसन्न

कोणताही आजार, विकार हा मुळात आपला शत्रू नसतोच, उलट त्याचे आपल्यावर उपकारच होतात. कारण त्यामुळे आपल्याला आपली चूक कळून येण्यास मदतच होते. विज्ञानात प्रत्येक कार्यामागे, परिणामामागे काहीतरी कारण असतेच त्याला कार्यकारण भाव म्हणतात. त्याप्रमाणे बहुतेक आजारांच्यामागे कोणता तरी मानसिक विकार, चुकीची विचारधारा हेच मुख्यत: कारण असते.

इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावाशी वाटते की, यामध्ये अपघात, जखमा, विषप्रयोग, विषबाधा, एखाद्या पदार्थाचे अतिसेवन, एखाद्या अवयवांची, शरीराची कायमची झालेली झीज इ. कारणांमुळे होणाऱ्या आजारांचा समावेश नाही.

या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व हे मर्यादित काळापुरतेच आहे. तेव्हा ज्ञान व अनुभव घेऊन त्याचा उपयोग स्वत:च्या प्रगतीसाठी व मानवकल्याणाकरीता करणे हे आपले कर्तव्य आहे. जे चूक आहे ते समजून घेऊन त्याजागी योग्य सद्गुण, सद्विचार प्रस्थापित करुन त्या चुकीचे निराकरण करणे जरुरी आहे.

आपले व्यक्तीमत्व व अंतरात्मा यांच्यात जोपर्यंत उत्तम समन्वय असेल तोपर्यंत आनंद, शांतता व आरोग्य नांदेल जेव्हा यांच्यातील समन्वय नष्ट होईल तेव्हा दु:ख, अशांती व अनारोग्य (आजार) उत्पन्न होतील. तसे मानसिक विकार अनेक प्रकारचे आहेत. पण त्यातील महत्वाचे आणि व्यक्तीच्या व पर्यायाने समाजाच्या विरोधात कृती करायला लावणारे असे काही महत्वाचे विकार पुढीलप्रमाणे :-

१) गर्व - या विश्वाच्या जगाच्या तुलनेत आपण किती छोटे, सूक्ष्म आहोत याचा विसर पडून उगीचच स्वत:ला मोठे समजणे, गर्वाने फुगलेली व्यक्ती सामान्यत: कोणासमोर वाकत नाही. निसर्गाच्या विरोधात कृती घडते.

२) क्रूरता - आपण आपल्या शब्दांनी, कृतीने दुसऱ्याला दु:ख दिल्यास मी त्या महान निर्मात्याच्या विरोधातील कृती ठरते. याचा आपल्याला विसर पडतो.

३) तिरस्कार, द्वेष - सर्व जगत् हे ईश्वराच्या प्रेमातून निर्माण झाले आहे, हे विर्विवाद सत्य नजरेआड करुन आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल दुसऱ्यास जबाबदार धरुन त्याचा द्वेष करणे, मनातले विचार, आपले शब्द आणि शारीरिक कृती तिरस्कारयुक्त असणे हे प्रेमाच्या साक्षात विरोधी आहे.

४) निष्काळजीपणा, दुर्लक्ष - ज्ञान व अनुभव घेण्याची संधी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे व निष्काळजीपणाने वागणे, बोलणे, सुधारणा ना? करणे इ. कृत्ये ईश्वराच्या हेतूंच्या विरोधात असणारच, हो ना?

५) स्वत:बद्दल अतिप्रेम - आपल्या कर्तव्याचा विसर पडून फक्त स्वत:पुरतेच पाहणे, सर्वव्यापी एकात्मतेचा विसर यामुळे हातून चुकीची कृती घडणे हे स्वाभाविकच आहे.

६) अस्थिरता - यात मनाची, विचारांची शरीराची अस्थिरता असते. अंतदात्म्याच्या मार्गदर्शनाकडे व्यक्ती दुर्लक्ष करते. त्यातूनच सारी अस्थिरता निर्माण होते. कार्यहेतू कमजोर होतात.

७) हाव - मनात हाव धरली की, आपण इतरांचा जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार नाकारतो. हे कर्म सुद्धा ईश्वराने मांडलेल्या विश्वाच्या विरोधातच असते.

८) मत्सर, हेवा - इतरांना प्राप्त झालेले वैभव आपल्याजवळ नाही म्हणून मनाची होणारी घालमेल. त्या विचारांमध्येच सर्वांशी विशेषत: वैभव प्राप्त झालेल्या व्यक्तींशी माणुसकी हीनतेने वागणे इ.

क्रमशा...

(वैधानिक इशारा - सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे.)