शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

कोरोनाला मारा गोळी... आई-वडिलांना काळजी मुलांच्या शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

राहुल शिंदे पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या ...

राहुल शिंदे

पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. तर १ लाख ३० हजार २ पालकांचा शाळा सुरू करण्यास अजूनही विरोध आहे.

लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर आता कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे. त्यातच ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे होणारे नुकसान पालक गेले दीड वर्षे अनुभवत आले आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची काळजी लागलेल्या सर्वाधिक पालकांनी शाळा उघडण्यास अनुकूलता दर्शवली आहे.

या सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ हजार ८३८ पालक सहभागी झाले होते. राज्यातल्या एकूण ८१.१८ टक्क्यांहून अधिक पालकांना शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. तर राज्यातले केवळ १८.८२ टक्के पालक शाळा सुरू करण्याबाबत अजूनही अनुकूल नाहीत. सर्वाधिक संख्येने असणारा पालकांचा आग्रह पाहता राज्य सरकार आता किमान आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा तरी निर्णय घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग येत्या १५ जुलैपासून सुरू करण्याबाबत एससीईआरटीतर्फे ऑनलाईन सर्वेक्षण केले. सोमवारी रात्री ११.५५ वाजेपर्यंत या सर्वेक्षणात सहभागी होण्याची मुदत होती. त्यास राज्यातल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी प्रतिसाद देत मत नोंदवले. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात शहरी भागाइतकाच प्रतिसाद ग्रामीण भागातूनही मिळाला. दोन्ही भागातील प्रत्येकी ३ लाखांहून अधिक पालकांनी सर्वेक्षणात भाग घेतल्याचे सांगण्यात आले. दोन्ही भागातील बहुसंख्य पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवण्यास अनुकूल असल्याचे यात स्पष्ट झाले आहे.

चौकट

“विद्यार्थी सुमारे दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. होत आहेत. शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू करणेच आता योग्य राहील. शासनाने प्रत्येक शाळेसाठी लसीकरणासाठी वेगळी तरतूद केली पाहिजे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत. स्थानिक प्रशासनानेसुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.”

-दिलीप सिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंट्स

चौकट

सर्वेक्षणाला सर्वाधिक पालकांचा प्रतिसाद मिळालेले दहा जिल्हे

पुणे- ७३,८३८

मुंबई - ७०,८४२

नाशिक - ४७,२०२

सातारा -४१,२३३

ठाणे - ३९,२२१

अहमदनगर - ३४,०६७

कोल्हापूर - ३०,४३७

पालघर - २३,३३९

सोलापूर - २२,२५४

जळगाव -१८,७८०

चौकट

कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या किती पालकांनी दिले मत

शिशुवर्ग : १९ हजार २७३

पहिली ते पाचवी : १ लाख ६२ हजार १८४

सहावी ते आठवी : २ लाख १५ हजार ५९०

नववी ते दहावी : २ लाख ८६ हजार ९९०

अकरावी ते बारावी : १ लाख ५ हजार ३९२