शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: February 6, 2015 00:31 IST

दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत.

धनकवडी : दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत. अनेकांची रोजी-रोटी त्यावर अवलंबून असताना, या भागात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे व्यावसायिकांबरोबरच नागरिक हैराण झाले आहेत.दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. विद्युतवाहिन्या भूमिगत केल्यापासून पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांमध्ये आर्द्रता जाण्यामुळे वारंवार विद्युत ाुरवठा खंडित होतो. मात्र सध्या कोणतीच परिस्थिती नसताना देखील वीज खंडित होण्यामुळे छोटे व्यावसायिक रस्त्यावर येण्याची व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांकडे जनरेटरची सुविधा असल्याने काम सुरु राहते. मात्र, सध्या सुरूअसलेल्या मंदीमुळे जनरेटर चालविणेदेखील परवडत नाही. या व्यावसायिकांकडून मोठ्या कंपन्यांना वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच कायम व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुणेकरांकडून जादा वीज आकार भरून देखील अशी परिस्थिती असल्याने व्यावसायिकांमध्ये महावितरणविषयी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वीजबिलांमधून अनेक प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यामानाने सेवा मिळत नाही. एखाद्या वेळी वीजबिल भरण्यास विलंब झाल्यास रीतसर जोड बंद केला जातो. याकडे ‘महावितरण’ने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांनादेखील याबद्दल वीजजोड वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लाच प्रकरणातून एक वर्षापूर्वी चार वरिष्ठ अधिकारी एकाच दिवशी एकाच वेळी जाळ्यात सापडले होते. तरीदेखील अद्याप कारभार सुधारला असल्याचे दिसत नाही. वीज जोडणीसाठी कार्यालयात जमा केलेली फाईल धूळ खात पडते. ‘महावितरण’ कंपनीचे अधिकारी ग्राहकांना सेवा देण्यात अकार्यक्षम असतील, तर त्यांची तत्काळ बदली करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. तातडीने दखल न घेतल्यास व्यावसायिकही आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.(वार्ताहर)४स्थानिक महावितरण कार्यालयाकडे तक्रार करण्याविषयी सक्षम यंत्रणा नाही. टोल फ्री नंबर असूनही त्याचे नियंत्रण मुंबईवरून होत असल्याने तक्रार दाखल होत नाही. ‘महावितरण’चे अधिकारी मोबाईल उचलतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे तक्रार कोठे करायची, हा प्रश्न कायमच राहतो. तक्रारकेंद्र धनकवडीच्या कार्यालयात केल्यास या भागात तक्रार नोंदविता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. ‘महावितरण’ने असाच शॉक ऐन दहीहंडीच्या उत्सवात दिल्याने रात्री बारा वाजता धनकवडीकरांनी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.