शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: February 6, 2015 00:31 IST

दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत.

धनकवडी : दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत. अनेकांची रोजी-रोटी त्यावर अवलंबून असताना, या भागात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे व्यावसायिकांबरोबरच नागरिक हैराण झाले आहेत.दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. विद्युतवाहिन्या भूमिगत केल्यापासून पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांमध्ये आर्द्रता जाण्यामुळे वारंवार विद्युत ाुरवठा खंडित होतो. मात्र सध्या कोणतीच परिस्थिती नसताना देखील वीज खंडित होण्यामुळे छोटे व्यावसायिक रस्त्यावर येण्याची व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांकडे जनरेटरची सुविधा असल्याने काम सुरु राहते. मात्र, सध्या सुरूअसलेल्या मंदीमुळे जनरेटर चालविणेदेखील परवडत नाही. या व्यावसायिकांकडून मोठ्या कंपन्यांना वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच कायम व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुणेकरांकडून जादा वीज आकार भरून देखील अशी परिस्थिती असल्याने व्यावसायिकांमध्ये महावितरणविषयी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वीजबिलांमधून अनेक प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यामानाने सेवा मिळत नाही. एखाद्या वेळी वीजबिल भरण्यास विलंब झाल्यास रीतसर जोड बंद केला जातो. याकडे ‘महावितरण’ने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांनादेखील याबद्दल वीजजोड वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लाच प्रकरणातून एक वर्षापूर्वी चार वरिष्ठ अधिकारी एकाच दिवशी एकाच वेळी जाळ्यात सापडले होते. तरीदेखील अद्याप कारभार सुधारला असल्याचे दिसत नाही. वीज जोडणीसाठी कार्यालयात जमा केलेली फाईल धूळ खात पडते. ‘महावितरण’ कंपनीचे अधिकारी ग्राहकांना सेवा देण्यात अकार्यक्षम असतील, तर त्यांची तत्काळ बदली करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. तातडीने दखल न घेतल्यास व्यावसायिकही आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.(वार्ताहर)४स्थानिक महावितरण कार्यालयाकडे तक्रार करण्याविषयी सक्षम यंत्रणा नाही. टोल फ्री नंबर असूनही त्याचे नियंत्रण मुंबईवरून होत असल्याने तक्रार दाखल होत नाही. ‘महावितरण’चे अधिकारी मोबाईल उचलतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे तक्रार कोठे करायची, हा प्रश्न कायमच राहतो. तक्रारकेंद्र धनकवडीच्या कार्यालयात केल्यास या भागात तक्रार नोंदविता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. ‘महावितरण’ने असाच शॉक ऐन दहीहंडीच्या उत्सवात दिल्याने रात्री बारा वाजता धनकवडीकरांनी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.