शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

... तर शिवरायांनी विरोध केला असता!

By admin | Updated: May 1, 2017 02:34 IST

आज शिवाजीमहाराज असते, तर कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च विरोध केला

पिंपरी : आज शिवाजीमहाराज असते, तर कोट्यवधी रुपये खर्च करून अरबी समुद्रात पुतळा उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च विरोध केला असता, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केले. चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाचदिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार अध्यक्षस्थानी होते; तसेच बाळासाहेब मरळ, मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे, मंडळाचे सचिव गजानन चिंचवडे, प्रदीप पवार उपस्थित होते. सरोदे म्हणाले, ‘‘नुसते उंच झेंडे लावले आणि कोट्यवधी रुपये उधळून पुतळे उभारले, की सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात कोणता फरक पडतो; परंतु असा प्रश्न विचारण्याची कोणी हिंमत करू शकत नाही.’’कालिदास यादव, सुहास पोफळे, महेश गावडे, ज्ञानोबा जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजन केले. वैभव गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. महेश बारसावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अतुलनीय भारत’ यांसारख्या फसव्या जाहिराती केल्या जातात. नागरिकांकडून कररूपाने गोळा झालेल्या पैशांतून मोठे बॅनर लावले जातात; पण अशा प्रतीकात्मक पद्धतीने देशप्रेम व्यक्त केल्याने लोकशाही सुदृढ होत नाही किंवा समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचत नाही. राजकीय पक्ष आपले हेतू साध्य करण्यासाठी मोर्चे, आंदोलने करून विध्वंसक कारवाया करतात आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतात, असे सरोदे म्हणाले.प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याची गरजनुसती ‘मन की बात’ नको, आता थेट लोकांशी बोला. शासनाच्या चुकीच्या निर्णयांना ठाम विरोध केलाच पाहिजे. इंदिरा गांधी यांनी लोकशाहीविरोधी भूमिका घेताच जनतेने त्यांना उखडून फेकून दिले. आताच्या सरकारची त्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ज्या वेळी एखादा राजकीय पक्ष खूप वाढतो, त्या वेळी सामान्य माणसांवर अन्याय वाढतो आहे. याचे ते लक्षण असते. निवडणुका जिंकल्या आणि बहुमत प्रस्थापित झाले म्हणजे तो राजकीय पक्ष चांगला असे मुळीच नसते. ईव्हीएम मशिन घोटाळा, अवास्तव टोल आकारणी, भयमुक्त राजकारण अशा अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला पाहिजे, असे सरोदे म्हणाले.