नारायणगाव : लॉकडाऊनमुळे अनेक गरीब आणि गरजू लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत ७५ शिवभोजन थाळी ऐवजी २०० ते ५०० लोकांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगावचे सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांनी दिली.
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी नारायणगाव बसस्थानकासमोर लोकांना शिवभोजन थाळी देण्याचा शुभारंभ झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांच्या हस्ते गरिबांना थाळी देऊन उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष पाटे, संतोष दांगट, अनिल खैरे, राजेश बाप्ते, राजूशेठ पाटे, निलेश जाधव, मयूर विटे, आकाश कानसकर, जालिंदर खैर, ईश्वर पाटे आदी उपस्थित होते.
सरपंच पाटे म्हणाले की, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात १० एप्रिल २०२० पासून शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. त्याला एक वर्ष झाले आहे, आज पर्यंत एकही दिवस ही शिवभोजन थाळी बंद नाही. गरीब, गरजू लोकासाठी ७५ लोकांसाठी शिवभोजन थाळीची मान्यता आहे मात्र सध्याची कोविडमधील लोकांचे झालेले हाल व त्यांची गरज ओळखून प्रतिष्ठानच्या वतीने २०० ते ५०० लोकांना विनामूल्य शिवभोजन थाळी देणार आहे.
--
कोट
उद्यापासून ग्रामपंचायत कार्यालयातून या थाळीचे वाटप करण्यात येणार असून गर्दी वाढली तर प्रभाग निहाय थाळीचे वाटप केले जाईल. रस्त्याने पायी जाणाऱ्या कुटुंबाना बसस्थानका जवळ शिवभोजन थाळी देण्यात येईल
-
योगेश पोटे,
सरपंच, नारायणगाव
--
फोटो क्रमांक : २४नारायणगाव शिवभोजन थाळी
फोटो ओळी : राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन थाळीचे वाटप करताना सरपंच योगेश पाटे, आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष दांगट, अनिल खैरे, राजेश बाप्ते, राजू पाटे.