शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पवारसाहेबांचा शब्द खरा ठरला!

By admin | Updated: May 19, 2014 01:49 IST

सांगवीच्या सभेत ‘गद्दारांना धडा शिकवा, पैशांची मस्ती उतरवा’, अशी जळजळीत टीका जगतापांवर केली होती. ते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे शब्द खरे ठरले.

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन शेकापकडून लढणार्‍या आमदार लक्ष्मण जगताप यांचा धक्कादायक पराभव झाला. मोदींची सुनामी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी घेतलेले वैर, अनधिकृत बांधकाम प्रश्नाविषयी मनसेचे राज ठाकरे यांनी केलेला पलटवार, प्रचाराचे उत्तम नियोजन व रसद पोहोचूनही न झालेला फायदा, स्वकीयांनीच दाखविलेले काम, केलेली जळजळीत टीका ही  जगताप यांच्या अपयशाची कारणे आहेत. सांगवीच्या सभेत ‘गद्दारांना धडा शिकवा, पैशांची मस्ती उतरवा’, अशी जळजळीत टीका जगतापांवर केली होती. ते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे शब्द खरे ठरले. उपमुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून आमदार जगतापांची ओळख आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. ते स्थायी समिती निवडणूक, विषय समित्या, शिक्षण मंडळ निवडणुकीत दिसून आले आहे. सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसराचा नियोजनबद्ध विकास केल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून त्यांनी राजकीय शक्ती निर्माण केली होती. शिवसेनेतील खासदारालाच फोडून, त्यांचा एक गट, राष्टÑवादीची मोठी शक्ती मागे असताना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळवूनही अपयशास सामोरे जावे लागले. त्यांची राजकीय समीकरणे बिघडत गेल्याने त्याचा फटका त्यांना बसला. पराभवास सामोरे जावे लागले. जगताप यांच्या अपयशाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील - मावळ लोकसभेतून जगताप यांचे नाव जवळजवळ निश्चित असताना २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार पानसरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर बंड केले. पक्षविरोधी काम करणार्‍याला उमेदवारी मिळत असेल, तर राष्टÑवादीत राहण्यात अर्थ नाही, म्हणून आझम पानसरे यांनी राष्टÑवादीला राम राम ठोकला. त्यातच अनधिकृत बांधकाम प्रश्न सुटला, तरच लोकसभा लढणार अशी भूमिका जगताप यांनी घेतली होती. आचारसंहिता लागली, तरी राज्य सरकारने प्रश्न सोडविला नाही म्हणून जगताप यांनी राष्टÑवादी काँग्रेसने देऊ केलेली उमेदवारी नाकारली. गेल्या लोकसभा निवडणुकीत घाटाखाली शेतकरी कामगार पक्षाची जादू चालली होती. या निवडणुकीतही ती चालेल, असा विश्वास जगताप यांना होता; मात्र घाटाखालील दोनच मतदारसंघांत त्यांना यश मिळाले. २००९ च्या विधानसभेत अपक्ष असतानाही राष्टÑवादी काँग्रेसचा भक्कमपणे पाठिंबा होता. स्थानिक नेते अप्रत्यक्षपणे पाठीशी होते. मात्र, या वेळी राष्टÑवादीने शिवसेनेतून आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत चिंचवड आणि पिंपरी विधानसभेतील स्थानिक नेते उघडपणे भाऊंच्या पाठीशी होते. मात्र, त्यांनी मनापासून काम केलेले नसल्याचे दिसून येते. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या गोटात असणारे बरेचसे कार्यकर्ते दुखावले गेल्याने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपली शक्ती दाखवून दिली. दुसरी गोष्ट म्हणजे राष्टÑवादीचे वर्चस्व असणार्‍या पिंपरी, चिंचवड, मावळ भागात मतांचे विभाजन झाले. ज्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न घेऊन जगताप यांनी दोनदा आमदारकीचा राजीनामा दिला, त्या राजकीय भांडवलाचा काहीही फायदा झाला नाही. तसेच उमेदवारी नाकारल्यापासून ते राष्टÑवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्टÑवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर विखारी टीका केली. सांगवीच्या सभेत अध्यक्ष शरद पवार यांनी जगतापांवर तोफ डागली होती. अत्यंत त्वेषाने बोलत होते. ‘पैशांचा दर्प चढला की माणूस हवेत जातो. तो अहंकाराचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. गद्दारांना धडा शिकवा. पैशाची मस्ती जिरवा, अशी टीका केली होती. गेल्या काही वर्षांतील साहेबांचे हे भाषण अत्यंत विखारी होते, उपमुख्यमंत्र्यांनी पक्षविरोधी काम करणार्‍यांना १६ मे नंतर पाहून घेऊ, गाठ माझ्याशी आहे, असा दम दिला होता. (प्रतिनिधी)