शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

शरद पवारांनी मला मोजत बसू नये, सोयीने ‘प्रबोधनकार’ वाचू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे, यासाठी मी ‘ते’ विधान केले होते. माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मी काय वाचले हे माझे मला माहिती आहे. मी प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. ‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का? हा प्रश्न कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा प्रश्न ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. “उगाच मला मोजायचा प्रयत्न करू नका. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळेल, या शब्दांत ठाकरे यांनी पवारांना फटकारले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकी वाढदिवसानिमित्त ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी राज यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे लेखन वाचण्याचा सल्ला दिला होता. त्याला राज यांनी शुक्रवारी (दि.२०) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

ठाकरे म्हणाले, “एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांनी न होता ‘फुले-शाहू-आंबेडकर’ अशी कशी होते? तुम्ही यांचा विचार घेऊन पुढे जाणार तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूळ विचार घेऊन पुढे का जात नाही,” असा सवाल त्यांनी शरद पवारांना उद्देशून केला.

“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे ते ‘ब्राह्मण’ आहेत म्हणून नव्हे तर ते इतिहास संशोधक आहेत म्हणून मी जातो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. त्यांच्या पुस्तकाची पन्नास साली पहिली आवृत्ती आली. तेव्हापासून काही पुढे आले नाही. राजकारणासाठी एजंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवले जाते. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. हे सगळं व्यवस्थित नियोजन होते,” असा आरोपही ठाकरे यांनी केला. जाती-जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. जातीचे संदर्भ देऊन ऐतिहासिक संदर्भ सांगण्याचा काही संबंध आहे का? महाराष्ट्राला खेळवले जात आहे. जनतेने हे समजून घ्यावे, असे ते म्हणाले.