शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी मला मोजत बसू नये, सोयीने ‘प्रबोधनकार’ वाचू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे, यासाठी मी ‘ते’ विधान केले होते. माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मी काय वाचले हे माझे मला माहिती आहे. मी प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. ‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का? हा प्रश्न कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा प्रश्न ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. “उगाच मला मोजायचा प्रयत्न करू नका. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळेल, या शब्दांत ठाकरे यांनी पवारांना फटकारले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकी वाढदिवसानिमित्त ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी राज यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे लेखन वाचण्याचा सल्ला दिला होता. त्याला राज यांनी शुक्रवारी (दि.२०) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

ठाकरे म्हणाले, “एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांनी न होता ‘फुले-शाहू-आंबेडकर’ अशी कशी होते? तुम्ही यांचा विचार घेऊन पुढे जाणार तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूळ विचार घेऊन पुढे का जात नाही,” असा सवाल त्यांनी शरद पवारांना उद्देशून केला.

“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे ते ‘ब्राह्मण’ आहेत म्हणून नव्हे तर ते इतिहास संशोधक आहेत म्हणून मी जातो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. त्यांच्या पुस्तकाची पन्नास साली पहिली आवृत्ती आली. तेव्हापासून काही पुढे आले नाही. राजकारणासाठी एजंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवले जाते. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. हे सगळं व्यवस्थित नियोजन होते,” असा आरोपही ठाकरे यांनी केला. जाती-जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. जातीचे संदर्भ देऊन ऐतिहासिक संदर्भ सांगण्याचा काही संबंध आहे का? महाराष्ट्राला खेळवले जात आहे. जनतेने हे समजून घ्यावे, असे ते म्हणाले.