शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

शाहिरी कलेलाच आली अवकळा

By admin | Updated: February 4, 2015 00:34 IST

रोमांचक कवनांद्वारे शाहिरांनी एक काळ जागविला. सळसळते चैतन्य निर्माण करणारी शाहिरीकला आज लोप पावत चालली आहे की काय,

प्रसन्न पाध्ये - पुणेत्रिवार करुन जयजयकार, योगीराज थोर शाहीर आतूर, डफावर चढे साज शौर्याचा शिवाजी पुत्र महाराष्ट्राचा, छत्रपती डंका चहुमुलखीचा या आाणि अशा रोमांचक कवनांद्वारे शाहिरांनी एक काळ जागविला. सळसळते चैतन्य निर्माण करणारी शाहिरीकला आज लोप पावत चालली आहे की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अभावानेच होणारे शाहिरीचे कार्यक्रम त्यामुळे कुटुंब पोसायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे केवळ शासकीय योजनांची माहिती गावोगाव पोहोचविण्यासाठी हे शाहीर प्रयत्न करीत असून, पोटाळी खळगी भरत आहेत.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज शंभरावर फड आहेत. तर शाहिरांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. शिवजयंतीलाच या शाहिरांच्या कलेचा कान केला जातो इतर वेळी मात्र या कलाकारांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. प्रबोधन करणे हा शाहिरी कलेचा मुख्य उद्देश. १२व्या शतकापासून चालत आलेली असल्याचे दाखले आढळतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांनी त्यांच्या ओव्यांमध्ये ‘पोवाड’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. इतकी पुरातन असलेली ही कला भविष्यात टिकेल की नाही हे सांगता येत नाही. १५९०मध्ये कऱ्हाडच्या कवी मनवथ शिवलिंग यांनी भवानी देवीवर पहिले काव्य लिहिल्याची नोंद आहे. भेदिक शाहिरीतून या परंपरेचा उगम झाला. भेदिक म्हणजे भक्तिरसप्रधान. बुद्धीचा भेद करणारी अशी शाहिरी. स्वराज्यासाठी ज्याचा उपयोग केला गेला ती दांगटी शाहिरी. आज सादर होणाऱ्या पोवाड्यांमध्ये याच शाहिरीचा उपयोग होतो. मध्यंतरीच्या काळात गोंधळी समाजाचे शाहिरी या कलेशी नाते जडले. गोंधळी समाजाने देवादिकांचे आख्यान सांगून स्वराज्यधर्म जागा ठेवला. देश पारतंत्र्यात होता. त्या काळातील परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककलाकारांना एकत्र केले आणि मराठी समाज शोधून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. मराठी मुलखातील मराठी माणसांनी सैन्यात यावे म्हणून त्या काळातील शाहिरांनी शिवधनुष्यच हाती घेतले. शिवकालीन ७ पोवाडे आज उपलब्ध आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान शाहिरांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. अमर शेख, अण्णा भाऊ साठे, आत्माराम पाटील, किसनराव हिंगे, अनुसयाबाई शिंदे, बापूराव विभुते, अंबूताई बुधगावकर यांनी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्यात मोलाची कामगिरी बजावली. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि शाहिरी कलेला उतरती कळाच लागली. पोवाड्याचे कार्यक्रम सध्या होत नाहीत. तरीही काही कलावंत ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारी योजना शाहिरीच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवून काही शाहीर उदरनिर्वाह करीत आहेत. ही कला जिवंत राहावी म्हणून लहान मुला-मुलींनाच शाहिरीचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहोत. - दादा पासलकर, अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर परिषद४मुद्राभिनय, सादरीकरणातून रसिकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाणाऱ्या अनेक लोककला आहे. नाटकाचा ‘फॉर्म’ नसला तरी नाट्यकलेइतकेच त्याला महत्व आहे. प्रबोधन करताना लोकांपर्यंत साभिनय पोहोचणाऱ्या या कलांना पूर्वी महत्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ते कमी झाले आहे. या लोककलाही नाट्याचा एक प्रकार. बेळगाव येथे होत असलेल्या नाट्य संमेलनानिमित्त काही लोकांचा घेतलेला आढावा.४ शाहीर प्रभाकर, सगनभाऊ, अनंत फंदी, राम जोशी, परशुराम, होनाजी हे काही प्रसिद्ध शाहीर. भेदिक शाहिरीतील हैबती हे एक प्रसिद्ध नाव. स्वांतत्र्यपूर्व काळातील सिद्राम मुचाटे (धुळे), लहरी हैदर (कोल्हापूर), तसेच नानिवडेकर, नारगोळकर, जंगमस्वामी ही नावाजलेली मंडळी. शाहिरी कवने गाऊन ब्रिटिशांविरुद्ध चिथावणी दिली म्हणून काही शाहिरांनी तुरुंगवास भोगला असल्याच्या नोंदी आहेत.