शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

शाहिरी परंपरेला नाही राजाश्रय

By admin | Updated: August 29, 2016 03:03 IST

शाहिरी परंपरेला अद्यापही लोकाश्रय आहे, राजाश्रय मात्र मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शाहिरी परिषदेला गेली पाच वर्षे अधिवेशन घेता आले नाही

पिंपरी : शाहिरी परंपरेला अद्यापही लोकाश्रय आहे, राजाश्रय मात्र मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शाहिरी परिषदेला गेली पाच वर्षे अधिवेशन घेता आले नाही, अशी खंत शाहीर परिषदेचे प्रांताध्यक्ष दादा पासलकर यांनी व्यक्त केली. प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या मनोहर वाढोकार सभागृहात स्वर्गीय शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार वितरण झाले. कोल्हापूरचे शाहीर रंगराव पाटील यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी पासलकर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शाहिराची गरज समाजाला आहे. स्वर्गीय शाहीर योगेश अण्णांनी दाखविलेल्या मार्गावरून चालत आहोत. शब्दांचे भांडवल साहित्यिकांपेक्षा शाहिरांकडे अधिक असते. शाहिराला शाबासकीची थाप पडावी, अशी अपेक्षा असते. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले खासदार अमर साबळे म्हणाले, ‘‘शाहिरी परंपरा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु जोपर्यंत या देशात शौर्य गाजविणारे लोक आहेत, तोपर्यंत शाहिरी परंपरा लोप पावणार नाही, हे लक्षात घ्यावे. शाहिरी परंपरेला राजाश्रय मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील. शाहिरी कलावंतांसाठी शहरात एखादे दालन सुरू केल्यास खासदार निधीतून निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र शासनाचा नमामी गंगा हा नदी स्वच्छतेचा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी शाहिरांची मदत आवश्यक वाटल्यास घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन म्हणाले, ‘‘शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दर वर्षी अनुदान दिले जाते. त्यासाठी परिषदेने प्रस्ताव पाठवावा. इतिहासाचे पोवाडे शाहिरांनी सादर करावेतच,पण बदलत्या काळात विकासाचे पोवाडेसुद्धा रचावेत. कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा पोवाड्यातून सादर करावी.’’ बालशाहीर हेरंब पायगुडे, ऋतिक धार्इंजे, संतोष कापसे, पार्थ साळवी, प्रणव कापसे यांचाही सन्मान करण्यात आला. निमंत्रक प्रवीण घुले, हेमंतराजे मावळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप जाधव, एकनाथ पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)