शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

पाण्याच्या स्रोतांमध्ये मैलामिश्रित सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:17 IST

चाकण: शहरातील, तसेच आसपासच्या परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पााण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे चाकणमधील ओढ्याचे पाणी फेसाळले असून ...

चाकण: शहरातील, तसेच आसपासच्या परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पााण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे चाकणमधील ओढ्याचे पाणी फेसाळले असून हेच पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा नदीला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

चाकण नगरपरिषदेच्या वतीने सध्या शहरात स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या ओढ्यातील गा मिश्रित कचरा काढण्यात येत आहे.त्यामुळे सांडपाणी वाहून जाते आहे, मात्र नगरपरिषदेच्या हद्दीतील पठारवाडी येथील याच ओढ्यात कचरा साठल्याने दुर्गंधी सुटली आहे. सांडपाण्यावर फेस तयार झाला आहे. हेच दुर्गंधीयुक्त फेसाळलेले सांडपाणी पुढे भामा नदीला जाऊन मिळत आहे. राक्षेवाडी,पठारवाडी या भागासह पुढे काळूस येथील अनेक नागरिक हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापर करतात, त्यामुळे हे पाणी पिणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नैसर्गिक ओढे, नदी आणि नाले हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवण्याची मनोवृत्ती नसल्यामुळे त्यांची गटारे बनल्याचे चित्र चाकण पालिकेच्या हद्दीत व परिसरात हमखास पाहावयास मिळते. अनेक लोकांनी या ओढ्यात सांडपाणी व मैला मिश्रीत पाणी सोडले आहे.तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या ओढ्यात आल्याने पाणी पुढे जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

एकेकाळी पावसाचे पाणी वाहून नदीकडे नेणाऱ्या या जलस्रोताला पूर येत होता. हे चित्र आता झपाट्याने बदलत असून गृहप्रकल्पांचे सांडपाणी आणि मैला वाहत असलेले सांडपाणी येथून वाहत आहे.चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी इतर वापरासाठी उपयोगात आणले जाऊ शकते.असा प्रकल्प राबवणे गरजेचे आहे.

भूजल प्रदूषणाचा विळखा

चाकण भागात साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी कोणत्याही विहिरीचे पाणी बिनधास्त पिता येत होते, तेच हातपंपाच्या पाण्याबाबतही होते. उघड्या वाहणाऱ्या पाण्याबाबत काही शंका असायच्या, पण भूजलाबाबत शंका घ्यायचे कारण नव्हते. त्याच्या दर्जासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या अहवालाची गरजही नव्हती. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. विहिरींना व हातपंपाना दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून भूजल प्रदूषणाच्या समस्याही या भागात निर्माण झाल्या आहेत.

११चाकण

पठारवाडी येथील सांडपाणी वाहून जात असताना त्यावर आलेला फेस.