शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या स्रोतांमध्ये मैलामिश्रित सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:17 IST

चाकण: शहरातील, तसेच आसपासच्या परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पााण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे चाकणमधील ओढ्याचे पाणी फेसाळले असून ...

चाकण: शहरातील, तसेच आसपासच्या परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पााण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे चाकणमधील ओढ्याचे पाणी फेसाळले असून हेच पाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा नदीला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

चाकण नगरपरिषदेच्या वतीने सध्या शहरात स्वछता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या ओढ्यातील गा मिश्रित कचरा काढण्यात येत आहे.त्यामुळे सांडपाणी वाहून जाते आहे, मात्र नगरपरिषदेच्या हद्दीतील पठारवाडी येथील याच ओढ्यात कचरा साठल्याने दुर्गंधी सुटली आहे. सांडपाण्यावर फेस तयार झाला आहे. हेच दुर्गंधीयुक्त फेसाळलेले सांडपाणी पुढे भामा नदीला जाऊन मिळत आहे. राक्षेवाडी,पठारवाडी या भागासह पुढे काळूस येथील अनेक नागरिक हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापर करतात, त्यामुळे हे पाणी पिणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नैसर्गिक ओढे, नदी आणि नाले हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवण्याची मनोवृत्ती नसल्यामुळे त्यांची गटारे बनल्याचे चित्र चाकण पालिकेच्या हद्दीत व परिसरात हमखास पाहावयास मिळते. अनेक लोकांनी या ओढ्यात सांडपाणी व मैला मिश्रीत पाणी सोडले आहे.तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या ओढ्यात आल्याने पाणी पुढे जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

एकेकाळी पावसाचे पाणी वाहून नदीकडे नेणाऱ्या या जलस्रोताला पूर येत होता. हे चित्र आता झपाट्याने बदलत असून गृहप्रकल्पांचे सांडपाणी आणि मैला वाहत असलेले सांडपाणी येथून वाहत आहे.चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी इतर वापरासाठी उपयोगात आणले जाऊ शकते.असा प्रकल्प राबवणे गरजेचे आहे.

भूजल प्रदूषणाचा विळखा

चाकण भागात साधारणत: २० ते २५ वर्षांपूर्वी कोणत्याही विहिरीचे पाणी बिनधास्त पिता येत होते, तेच हातपंपाच्या पाण्याबाबतही होते. उघड्या वाहणाऱ्या पाण्याबाबत काही शंका असायच्या, पण भूजलाबाबत शंका घ्यायचे कारण नव्हते. त्याच्या दर्जासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या अहवालाची गरजही नव्हती. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. विहिरींना व हातपंपाना दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून भूजल प्रदूषणाच्या समस्याही या भागात निर्माण झाल्या आहेत.

११चाकण

पठारवाडी येथील सांडपाणी वाहून जात असताना त्यावर आलेला फेस.