शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

सात-बाऱ्यावर आरक्षणाचे शिक्के नाही

By admin | Updated: March 8, 2017 04:54 IST

पुण्यासाठीचे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर बंदी आणू नये, तसेच जमिनीवर विमानतळासाठी

पुणे : पुण्यासाठीचे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर बंदी आणू नये, तसेच जमिनीवर विमानतळासाठी आरक्षित असे शिक्केदेखील मारू नयेत, असा अनोखा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्य शासनाला दिला आहे. शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास आरक्षित जमिनींवर हस्तांतरणाचे निर्बंध उठणार असून हा पहिला प्रयोग ठरणार आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना एमआयडीसी, धरण, राष्ट्रीय महामार्ग अथवा विमानतळासाठी आरक्षित जमीन असे शिक्के लगेच मारले जातात. एखाद्या प्रकल्पासाठी आरक्षित जमीन असे शिक्के पडल्यानंतर तो प्रकल्प रेंगाळला अथवा रद्द झाला तर संबंधित शेतकऱ्यांना त्या सात-बाऱ्यावर कोणत्याही स्वरुपाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. यामुळे असे शिक्के मारण्यास शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असतो. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शासनाला हा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच भूसंपदासाठी देण्यात येणाऱ्या नव्या पॅकेजच्या प्रस्तावातदेखील या बाबींचा उल्लेख केला आहे.पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्चित केली आहे. पुरंदर तालुक्यातील एखतपूर, पारगाव, मुंजेवाडी, कुंभारवळण, उदाची वाडी, वनपुरी आणि खानवडी या सात गावांतील जमिनी विमानतळासाठी भूसंपादित करण्यात येणार आहेत. मात्र त्यातून गावठाण वगळण्यात आले असून त्यापैकी दोनशे एकर जागा ही सरकारी आणि वनखात्याच्या मालकीची आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. अमरावती येथील पॅकेजचा विचार करता तेथील भूसंपादन अतिशय गतीने पूर्ण झाले. त्यामागे आरक्षित जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास असलेली बंदी राज्य सरकारने उठवल्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र हे व्यवहार होताना शेतकऱ्यांची कोणतेही नुकसान होणार नाही, यासाठीची यंत्रणा राज्य सरकारकडून उभारण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुरंदर येथील विमानतळासाठी आरक्षित जमिनींची खरेदी-विक्री करण्यास असलेली बंदी उठविण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. तसे केल्यास राज्यातील हा पहिला प्रयोग ठरणार असून भूसंपादनाचे कामही गतीने होण्यास मदत होईल, असे राव यांनी सांगितले.(प्रतिनिधी)विमानतळासाठी जागा निश्चित झाली आहे. जागेचे भूसंपादन करण्यासाठी विविध ठिकाणच्या पॅकेजचा अभ्यास करुन अंतिम प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणासमोर प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कोणत्या स्वरुपाचे पॅकेज देण्यात येणार हे निश्चित होईल. यामध्ये शेतकऱ्यांना पॅकेजबाबत एकापेक्षा अधिक पर्याय देण्यात आले आहेत, असे राव म्हणाले़