शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सात-बाऱ्यावर आरक्षणाचे शिक्के नाही

By admin | Updated: March 8, 2017 04:54 IST

पुण्यासाठीचे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर बंदी आणू नये, तसेच जमिनीवर विमानतळासाठी

पुणे : पुण्यासाठीचे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आरक्षित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर बंदी आणू नये, तसेच जमिनीवर विमानतळासाठी आरक्षित असे शिक्केदेखील मारू नयेत, असा अनोखा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्य शासनाला दिला आहे. शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास आरक्षित जमिनींवर हस्तांतरणाचे निर्बंध उठणार असून हा पहिला प्रयोग ठरणार आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना एमआयडीसी, धरण, राष्ट्रीय महामार्ग अथवा विमानतळासाठी आरक्षित जमीन असे शिक्के लगेच मारले जातात. एखाद्या प्रकल्पासाठी आरक्षित जमीन असे शिक्के पडल्यानंतर तो प्रकल्प रेंगाळला अथवा रद्द झाला तर संबंधित शेतकऱ्यांना त्या सात-बाऱ्यावर कोणत्याही स्वरुपाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. यामुळे असे शिक्के मारण्यास शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असतो. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शासनाला हा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच भूसंपदासाठी देण्यात येणाऱ्या नव्या पॅकेजच्या प्रस्तावातदेखील या बाबींचा उल्लेख केला आहे.पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्चित केली आहे. पुरंदर तालुक्यातील एखतपूर, पारगाव, मुंजेवाडी, कुंभारवळण, उदाची वाडी, वनपुरी आणि खानवडी या सात गावांतील जमिनी विमानतळासाठी भूसंपादित करण्यात येणार आहेत. मात्र त्यातून गावठाण वगळण्यात आले असून त्यापैकी दोनशे एकर जागा ही सरकारी आणि वनखात्याच्या मालकीची आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. अमरावती येथील पॅकेजचा विचार करता तेथील भूसंपादन अतिशय गतीने पूर्ण झाले. त्यामागे आरक्षित जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास असलेली बंदी राज्य सरकारने उठवल्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र हे व्यवहार होताना शेतकऱ्यांची कोणतेही नुकसान होणार नाही, यासाठीची यंत्रणा राज्य सरकारकडून उभारण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुरंदर येथील विमानतळासाठी आरक्षित जमिनींची खरेदी-विक्री करण्यास असलेली बंदी उठविण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. तसे केल्यास राज्यातील हा पहिला प्रयोग ठरणार असून भूसंपादनाचे कामही गतीने होण्यास मदत होईल, असे राव यांनी सांगितले.(प्रतिनिधी)विमानतळासाठी जागा निश्चित झाली आहे. जागेचे भूसंपादन करण्यासाठी विविध ठिकाणच्या पॅकेजचा अभ्यास करुन अंतिम प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणासमोर प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कोणत्या स्वरुपाचे पॅकेज देण्यात येणार हे निश्चित होईल. यामध्ये शेतकऱ्यांना पॅकेजबाबत एकापेक्षा अधिक पर्याय देण्यात आले आहेत, असे राव म्हणाले़