शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

तक्रारींचे गांभीर्य मोठे; कारवाई शून्यच

By admin | Updated: July 27, 2015 03:45 IST

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये शेकडो महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांना पुरुष कर्मचाऱ्यांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी ७

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये शेकडो महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांना पुरुष कर्मचाऱ्यांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी ७ सदस्यीय महिला तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. पालिकेतील अनेक महिला कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या गैरवर्तनाचा त्रास सहन करावा लागत असला तरी प्रत्यक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या खूप कमी आहे. समितीकडे तक्रार दाखल करू इच्छिणाऱ्या महिलांना त्यांची समजूत घालून अर्ज करू नये याकरिता तिला प्रवृत्त केले जाते. अगदी अर्ज दाखल झाल्यानंतरही अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे प्रकार घडत आहेत.दरवर्षी साधारणत: अधिकृतपणे ५ ते ६ तक्रारी पालिकेतील या समितीकडे दाखल होत आहेत. मात्र या तक्रारींचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी, डॉक्टर, शिक्षिका, क्लार्क, झाडलोट, बिगारी काम करणाऱ्या महिला यांच्याकडून या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी, मुकादम, रखवालदार, ड्रायव्हर, मेहतर म्हणून काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांविरुद्ध या तक्रारी आहेत. घटस्फोटित, विधवा, एकट्या असलेल्या महिलांना पुरुष सहकाऱ्यांच्या त्रासाला विशेष करून सामोरे जावे लागत आहे. अश्लील बोलणे, जाणूनबुजून स्पर्श करणे, शरीरसुखाची मागणी करणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत. तीन महिन्यांच्या आत महिलेची तक्रार निकाली काढण्याचे बंधन समितीवर आहे; मात्र प्रत्यक्षात या तक्रारींवर सुनावणी अनेक महिने सुरू राहते. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानंतरही केवळ वेतनवाढ रोखण्याची किरकोळ स्वरूपाची कारवाई समितीकडून केली गेली आहे. वस्तुत: नियमानुसार समितीकडे तक्रार आल्यानंतर सुनावणी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याची बदली करणे आवश्यक आहे. पीडित महिलेला जर रजेची आवश्यकता असेल तर तिला भरपगारी रजा उपलब्ध करून देणे तसेच तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला निलंबित करणे किंवा कामावरून काढून टाकणे इतपत अधिकार समितीला आहेत. राजस्थानमध्ये १९९७ साली एका गावात भवरीदेवी नावाच्या समाजसेविकेने सरपंचाच्या मुलाचा बालविवाह थांबवला होता. त्याचा राग मनात धरून त्या सरपंचाने या समाजसेविकेवरच सामूहिक बलात्कार केला. या गंभीर घटनेची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली. दिल्लीच्या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन उंबरठ्याबाहेर पडणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी समिती नेमावी, असे सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे महिला संरक्षणासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. तेव्हापासून देशभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे.