शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दौंड तालुक्यातील खोर व कौठडी गावांची मनरेगा योजनांंसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील असलेल्या ग्रामविकासाचा पाया भक्कम व्हावा व मनरेगा कामांबाबतचा रोजगार ग्रामीण भागांमधील गावं-गावामध्ये पोहोचावा, यामागचा उद्देश ...

केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील असलेल्या ग्रामविकासाचा पाया भक्कम व्हावा व मनरेगा कामांबाबतचा रोजगार ग्रामीण भागांमधील गावं-गावामध्ये पोहोचावा, यामागचा उद्देश आहे. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे व माजी उपसभापती नितीन दोरगे उपस्थितीत खोर व कौठडी या दोन गावांच्या नावाची मनरेगासाठी घोषणा करण्यात आली आहे.

सध्या ह्या योजनेचे नाव बदलून 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' असे करून नवीन शेतीविषयक कामांचा ह्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच काही कामांच्या अटी शिथिल केल्या गेल्या आहेत. ही अशी योजना आहे ज्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रत्येक कुटुंबाला कुठले न कुठले काम मनरेगा देऊन लाभ मिळवून देऊ शकते. ग्रामसभेच्या माध्यमातून कामे घेतली जातात व कृती आराखडा तयार होतो. या वेळी मनरेगामध्ये गाईगोठा प्रकरण करणे, शेळीपालन, कुक्कुटपालन, बांधबंदिस्ती वैयक्तिक लाभाच्या योजना याविषयी माहिती देण्यात आली. तसेच १०० कुटुंबांना १०० दिवस रोजगारविषयी मार्गदशन करण्यात आले. या वेळी ग्रामंपचायत सदस्या उज्ज्वला विकास चौधरी यांच्या वतीने पिंपळाचीवाडी येथे पाच गाईगोठा प्रकरणे (वैयक्तिक लाभ रक्कम ७७००० रूपये प्रत्येकी) पंचायत समितीकडून मंजूर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, माजी उपसभापती नितीन दोरगे, सरपंच वैशाली अडसूळ, उपसरपंच पोपट चौधरी, रामचंद्र चौधरी, विकास चौधरी, मारुती फडतरे, संदीप अडसूळ, सागर चौधरी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण भागातील गरजू व्यक्तीने या योजनेचा फायदा घ्यावा.

मनरेगा ही केंद्र शासनस्तरावरील योजना असून दौंड तालुक्यातील दुष्काळी भाग असलेल्या खोर व कौठडी या दोन गावांची निवड केली असून, जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

नितीन दोरगे (मा. उपसभापती, दौंड पंचायत समिती)

ग्रामविकासाचा राजमार्ग असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) दौंड तालुक्यातील खोर व कौठडी या दोन गावांची निवड करण्यात आली आहे.