शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

सुरक्षा आढावा घेऊनच बीआरटीबाबत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:02 IST

गर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत

पुणे : नगर रस्ता बीआरटीबाबत तातडीच्या तीन ते चार उपाययोजना करण्याबाबत पीएमपीची प्रमुख मागणी असून, या मागण्या तीन दिवसांत पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे या सुधारणा झाल्यानंतर येत्या २४ मे रोजी पुन्हा आढावा बैठक घेऊन त्यानंतरच नगर रस्ता बीआरटी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पीएमपी प्रशासनाकडून हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची मागणी करण्यात आली असली तरी आढावा बैठकीनंतरच या बाबत अंतिम निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यात आल्यापासून गेल्या २0 दिवसांत या मार्गावर १५हून अधिक लहान-मोठे अपघात झाले असून, एका ज्येष्ठ नागरिकाला प्राण गमवावा लागला आहे. त्यातच ही अपघातांची मालिका सुरूच असून, सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासनास अपयश येत आहे. त्यामुळे नगर रस्ता बीआरटीला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, हा मार्ग सुरक्षा उपाययोजना पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करावा अशी मागणी करणारे पत्र पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी (दि. २0) महापालिका आयुक्तांना दिले आहे. याबाबत बोलताना कुमार म्हणाले, की पीएमपीकडून या मार्गावर काही तातडीच्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पादचारी मार्गाजवळ गतिरोधक उभारणे, चौकांमध्ये वॉर्डन तसेच वाहतूक पोलीस नियुक्त करणे, यासह आणखी काही उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच पीएमपीकडून अपघातांची कारणे तसेच उपाययोजनांची माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गाबाबत आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतरही अपघात अथवा सुधारणा कमी वाटत असल्यास हा मार्ग बंद करण्याचा अंतिम निर्णय घेणार आहेत.