शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

बारामतीत भाविकांची स्कॉर्पिओ जळाली

By admin | Updated: February 10, 2017 02:58 IST

देवदर्शनाला निघालेल्या नाशिकच्या भक्तांची स्कॉर्पिओ गाडी (एमएच १५ सीटी ९०४९) गुरुवारी (दि ९) पहाटे आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली

बारामती : देवदर्शनाला निघालेल्या नाशिकच्या भक्तांची स्कॉर्पिओ गाडी (एमएच १५ सीटी ९०४९) गुरुवारी (दि ९) पहाटे आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. देवदर्शनाला निघालेल्या भक्तांनी बारामती शहरात मुक्काम केला होता. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या सिगारेटच्या पेटत्या थोटकामुळे आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत गाडी ९० टक्के जळून खाक झाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मच्छींद्र बाबूराव माळी (वय २८, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. ते चौघा मित्रांसह गाणगापूर येथे देवाला निघाले होते. रात्री ९ वाजता नाशिक येथून निघाल्यानंतर रात्री १२ वाजता बारामती शहरात पोहोचले.रात्री त्यांनी शहरातील बालाजी मंदिरात येथील मित्र सुनील माणिक मोदी (रा. गांधी चौक, बारामती) यांच्या समवेत गाडीतील इतर प्रवाशांसह मुक्काम केला. या वेळी त्यांनी गाडी रस्त्यालगत मंदिराबाहेर लावली. पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान त्यांना गाडीचा टायर फुटल्याचा आवाज आला. त्यामुळे ते मंदिराबाहेर आले. या वेळी त्यांच्या गाडीने पेट घेतल्याचे त्यांनी पाहिले. अग्निशामक वाहनाच्या मदतीने त्यांनी पेटलेली गाडी विझवली. मात्र, या घटनेत गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली.अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या सिगारेटच्या पेटत्या थोटकामुळे आग लागल्याचा संशय माळी यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अकस्मात जळीत म्हणून नोंद केली आहे. या घटनेत गाडी लावलेल्या ठिकाणी बाजूच्या पडीक घरांची लाकडे जळून खाक झाली आहेत. गाडीचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर पडीक घरांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अधिक तपास पोलीस नाईक विजय जगताप करीत आहेत. दरम्यान, वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.सायंकाळी के्रनच्या मदतीने गाडी उचलून ट्रकमध्ये नेण्यात आली. बारामती शहरात आग लागून गाडी जळाल्याची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. जळालेल्या गाडीबाबत विविध चर्चेला शहरात उधाण आले होते. (प्रतिनिधी)