शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञांमुळे भारत बनेल आर्थिक ‘सुपर पॉवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल,” असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.

पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते शुक्रवारी (दि.२७) बोलत होते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपपेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)चे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलपती डॉ. सी. पी. रामनारायण आदी यावेळी उपस्थित होते.

राजनाथसिंह म्हणाले, की भारताने उत्पादीत केलेल्या लसीचा आज अनेक जगातील अनेक देशांना फायदा होत आहे. देशात शोध आणि संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. संशोधनात भारत पुढे जात आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याला चालना मिळून त्यात आणखी गती यायला हवी. भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल पुण्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यासाठी डीआयएटीने पुढाकार घ्यावा.

“आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि बायो सायन्स या विषयात खूप काही करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप संशोधनाची गरज आहे. डीआयएटीतील डॉ. पवनकुमार खन्ना, डॉ. भास्कर मुजुमदार व आणखी एक अशा तीन शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. २ टक्के ब्रॅॅकेटमध्ये त्यांचा समावेश हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे,” असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी यावेळी काढले.

चौकट

‘आय-डेक्स’फौजीसाठी हजार कोटींची तरतुद

केंद्र सरकारने संरक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन व डिफेन्स एक्सलन्ससाठी (आय-डेक्स फॉर फौजी) बाहेरून खरेदीसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी तरतूद झाली. त्याचबरोबर डिफेन्स आणि एअरोस्पेस क्षेत्रात इनोव्हेशनसाठी तीनशे स्टार्ट-अपला साहाय्य केले जात आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी देण्यात आला.

चौकट

‘डीआयएटी’ला कोविडचे ९ पेटंट

पुण्यातील डीआयएटी संस्थेने कोविड-१९ संदर्भात सखोल संशोधन केले आहे. त्यासाठी ९ पेटंट मिळाले ही गौरवाची बाब असून भारतातील अनेक उद्योग त्याचा वापर करू लागले असल्याचे राजनाथसिंह म्हणाले.