शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शास्त्रज्ञांमुळे भारत बनेल आर्थिक ‘सुपर पॉवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल,” असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.

पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते शुक्रवारी (दि.२७) बोलत होते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपपेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)चे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलपती डॉ. सी. पी. रामनारायण आदी यावेळी उपस्थित होते.

राजनाथसिंह म्हणाले, की भारताने उत्पादीत केलेल्या लसीचा आज अनेक जगातील अनेक देशांना फायदा होत आहे. देशात शोध आणि संशोधनाचे वातावरण तयार झाले आहे. संशोधनात भारत पुढे जात आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याला चालना मिळून त्यात आणखी गती यायला हवी. भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल पुण्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यासाठी डीआयएटीने पुढाकार घ्यावा.

“आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि बायो सायन्स या विषयात खूप काही करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप संशोधनाची गरज आहे. डीआयएटीतील डॉ. पवनकुमार खन्ना, डॉ. भास्कर मुजुमदार व आणखी एक अशा तीन शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला. २ टक्के ब्रॅॅकेटमध्ये त्यांचा समावेश हा आपल्यासाठी गौरवाचा क्षण आहे,” असे गौरवोद्गार राजनाथसिंह यांनी यावेळी काढले.

चौकट

‘आय-डेक्स’फौजीसाठी हजार कोटींची तरतुद

केंद्र सरकारने संरक्षणाच्या दृष्टीने इनोव्हेशन व डिफेन्स एक्सलन्ससाठी (आय-डेक्स फॉर फौजी) बाहेरून खरेदीसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी तरतूद झाली. त्याचबरोबर डिफेन्स आणि एअरोस्पेस क्षेत्रात इनोव्हेशनसाठी तीनशे स्टार्ट-अपला साहाय्य केले जात आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी देण्यात आला.

चौकट

‘डीआयएटी’ला कोविडचे ९ पेटंट

पुण्यातील डीआयएटी संस्थेने कोविड-१९ संदर्भात सखोल संशोधन केले आहे. त्यासाठी ९ पेटंट मिळाले ही गौरवाची बाब असून भारतातील अनेक उद्योग त्याचा वापर करू लागले असल्याचे राजनाथसिंह म्हणाले.