शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळा फक्त चारच तास, तीही दिवसाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शाळा सुरू केल्यास दररोज चार तासांची असावी. एक दिवस प्रत्यक्ष आणि एक दिवस ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शाळा सुरू केल्यास दररोज चार तासांची असावी. एक दिवस प्रत्यक्ष आणि एक दिवस ऑनलाईन असे वर्गांचे नियोजन करावे. सर्व शिक्षक आणि कर्मचारीवर्गाचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यात अभ्यासावर भर न देता मुलांना शाळेशी जुळवून घ्यावे. या मार्गदर्शक सूचना बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत. हा वैद्यकीय सल्ला असून शाळा सुरू करण्याचा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे या कृती दलाने स्पष्ट केले आहे.

एकटेपणामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे मत कृती दलाचे सदस्य आणि भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी व्यक्त केले. डॉ. जोग म्हणाले, “दीड वर्षापासून घरी असल्याने मुलांमधील चंचलता, आक्रमकता, आक्रस्ताळेपणा वाढला आहे. मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन कमालीचे वाढले आहे. मोबाईलमुळे मुलांना प्रत्यक्ष संवाद थांबला आहे. अनेक मुलांचे पोषणही शाळांशी संबंधित असते. त्यामुळे शाळा सुरू होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारला वैद्यकीय सल्ला दिला आहे.”

चौकट

मार्गदर्शक तत्वे :

* शाळेच्या परिसराची स्वच्छता, वर्गांचे निर्जंतुकीकरण अत्यावश्यक.

* शाळेचा प्रवेश, वर्गातील प्रवेश, स्वच्छतागृहे आणि डबा खायला बसण्याची जागा या चार ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था हवी.

* शाळा सकाळी आणि दुुपारी अशा दोन शिफ्टमध्ये भरवावी.

* शाळेमध्ये आरोग्य केंद्र सुरू करावे. तिथे थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पॅरासिटॅमॉलसारख्या गोळ्या आणि प्रथमोपचार पेटी असावी. परिचारिका आणि डॉक्टरांची नेमणूक करता येईल. शाळेतील आरोग्य केंद्रात जवळच्या डॉक्टरांचा, रुग्णालयाचा, रुग्णवाहिकेचा क्रमांक नमूद करावा.

* वर्गातील हवा खेळती असावी. मुलांची बसण्याची जागा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विचारळ्रून केलेली असावी.

* शाळेमध्ये सर्वांना मास्कचा वापर अनिवार्य करावा.

चौकट

“शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांची सभा घेऊन विविध मुद्द्यांवर मते जाणून घेता येतील. चर्चा करता येईल, शंकांचे निरसन होईल. मुले आजारी असतील तर पालकांनी शाळेत पाठवू नये. शाळा जवळ असेल तर शक्यतो पालकांनी सोडायला जावे किंवा मुलांना चालत शाळेत पाठवावे. पहिल्या एक-दोन आठवड्यात अभ्यासावर भर न देता मुलांना शाळेशी जुळवून घेण्यास वेळ द्यावा. मुलांकडे मास्कचे तीन सेट असावेत.”

- डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्स