शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

पुढच्या वर्षीच्या अखेरीस स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:14 IST

पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सर्व रिक्त पदे ३१ जुलैअखेर भरणार, असे जाहीर केले होते. या घोषणेमुळे स्पर्धा परीक्षा ...

पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सर्व रिक्त पदे ३१ जुलैअखेर भरणार, असे जाहीर केले होते. या घोषणेमुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते. आज ना उद्या कोणत्या तरी पदाची जाहिरात येईल आणि परीक्षा देता येईल, अशी आशा विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र एमपीएएससी २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस जाहीर करणार असल्याचे ट्वीट केले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नाराजी पसरली असून, सरकारविरोधी संतापाची भावना आहे.

यापूर्वी शेवटची जाहिरात २०१९ मध्ये आली होती. त्यानंतर कोणतीही नवीन जाहिरात काढण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षे वाया गेले. नोव्हेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांचा अजून एका वर्षाचा कालावधी वाया जाणार आहे.

२०२० आणि २०२१ या वर्षात भरती झाली नाही. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग येईल, असे वाटले होते. मात्र, केवळ आश्वासने देऊन या सरकारने विद्यार्थ्यांना वेड्यात काढले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

राज्य सरकारने १५ हजार जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. त्याच काय झाले? ३० सप्टेंबरपर्यंत सगळ्या विभागांचे रिक्त पदांचे मागणी पत्र पाठवून जाहिरात काढणार होते. यावरून एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप होत आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विळख्यात २१ ते ३० या वयोगटातील तरुण पिढी अडकलेली आहे. सामाजिक अडचण, आर्थिक नुकसान, नैराश्य, मानसिक तणाव आदी गोष्टींचा तरुण सामना करीत आहेत. तसेच कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. नोव्हेंबरअखेरीस जाहीर झाले, तर परीक्षा थेट सहा महिन्यांनंतर होतील. यावरून सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत असल्याच्या आरोप स्पर्धा परीक्षेतून होत आहे.