शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

नोव्हेंबरमध्येच टंचाईच्या झळा!

By admin | Updated: November 22, 2015 03:31 IST

बारामती तालुक्याचा जिरायती भाग आताच दुष्काळाने होरपळू लागला आहे. चार-पाच वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे येथील विहिरीतील पाणीपातळी कमी होत चालली आहे

माळेगाव : बारामती तालुक्याचा जिरायती भाग आताच दुष्काळाने होरपळू लागला आहे. चार-पाच वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे येथील विहिरीतील पाणीपातळी कमी होत चालली आहे. तळी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत तर ओढे-नाले तर केव्हाचे सुकले आहेत. पुढील काळात तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. जनावरांच्या पिण्यासाठी पाणी नाही. चाऱ्याचा प्रश्नही लवकरच ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी जोर पकडू लागली आहे. महिलावर्गावर पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ आल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. दुष्काळाचे हे विदारक दृश्य तालुक्यातील कऱ्हावागज, अंजनगाव, ढाकाळे, सोनकसवाडी, जळकेवाडी, सायंबाचीवाडी, मुढाळे, मुर्टी, लोणी, मासाळवाडी, तरडोली, पवारवाडी या आसपासच्या गावांमधून समोर येऊ लागले आहे. ही गावे दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष झेलत असतात. मग ते शेतीसाठी पाणी असो वा पिण्यासाठी. कशीबशी पिके काढायची व दिवस घालवायचे अशीच काहीशी परिस्थिती. या परिसरातील शेती प्रामुख्याने विहिरींवर आधारित आहे. जवळपास कोणताच मोठा पाण्याचा स्रोत नाही. त्यामुळे पडेल त्या पावसावरच शेती अवलंबून आहे. शेतात उभी असलेली ज्वारी, हरभरा इत्यादी पिके सूर्य वर आला की माना टाकत आहेत. कांद्याची तर पुरती नासाडी झाली आहे. कांदा गेल्याने ज्वारी तरी होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली; परंतु आता बाटूक तरी हातात येइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनाने आमच्या व्यथा समजून घ्याव्यात अशी केविलवाणी प्रतिक्रिया जिरायती भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. वरुणराजाने आमच्यावर अवकृपा केली आहे. आता शासन तरी आम्हाला तारणार का, अशा शब्दांत परिसरातील शेतकरी आर्त हाक देत आहेत. (वार्ताहर)