शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरमध्येच टंचाईच्या झळा!

By admin | Updated: November 22, 2015 03:31 IST

बारामती तालुक्याचा जिरायती भाग आताच दुष्काळाने होरपळू लागला आहे. चार-पाच वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे येथील विहिरीतील पाणीपातळी कमी होत चालली आहे

माळेगाव : बारामती तालुक्याचा जिरायती भाग आताच दुष्काळाने होरपळू लागला आहे. चार-पाच वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे येथील विहिरीतील पाणीपातळी कमी होत चालली आहे. तळी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत तर ओढे-नाले तर केव्हाचे सुकले आहेत. पुढील काळात तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. जनावरांच्या पिण्यासाठी पाणी नाही. चाऱ्याचा प्रश्नही लवकरच ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी जोर पकडू लागली आहे. महिलावर्गावर पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ आल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. दुष्काळाचे हे विदारक दृश्य तालुक्यातील कऱ्हावागज, अंजनगाव, ढाकाळे, सोनकसवाडी, जळकेवाडी, सायंबाचीवाडी, मुढाळे, मुर्टी, लोणी, मासाळवाडी, तरडोली, पवारवाडी या आसपासच्या गावांमधून समोर येऊ लागले आहे. ही गावे दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष झेलत असतात. मग ते शेतीसाठी पाणी असो वा पिण्यासाठी. कशीबशी पिके काढायची व दिवस घालवायचे अशीच काहीशी परिस्थिती. या परिसरातील शेती प्रामुख्याने विहिरींवर आधारित आहे. जवळपास कोणताच मोठा पाण्याचा स्रोत नाही. त्यामुळे पडेल त्या पावसावरच शेती अवलंबून आहे. शेतात उभी असलेली ज्वारी, हरभरा इत्यादी पिके सूर्य वर आला की माना टाकत आहेत. कांद्याची तर पुरती नासाडी झाली आहे. कांदा गेल्याने ज्वारी तरी होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली; परंतु आता बाटूक तरी हातात येइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनाने आमच्या व्यथा समजून घ्याव्यात अशी केविलवाणी प्रतिक्रिया जिरायती भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. वरुणराजाने आमच्यावर अवकृपा केली आहे. आता शासन तरी आम्हाला तारणार का, अशा शब्दांत परिसरातील शेतकरी आर्त हाक देत आहेत. (वार्ताहर)