शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई अनुदानवाटपातही दिरंगाई!

By admin | Updated: April 20, 2016 00:55 IST

पुरंदरमधील २८ गावांना टंचाई पीक अनुदानापोटी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी काही गावांत अनुदानाचे प्रतीकात्मक वाटपही केले

बाळासाहेब काळे,  जेजुरीपुरंदरमधील २८ गावांना टंचाई पीक अनुदानापोटी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी काही गावांत अनुदानाचे प्रतीकात्मक वाटपही केले. मात्र, तहसील प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही रक्कम अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही. टंचाई संपल्यानंतर अनुदान मिळणार का, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत.शासकीय मदत ही दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मोठा दिलासा देणारी ठरते. मात्र, पुरंदर तहसील प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नाही, असे दिसत आहे. याबाबत तहसीलदारांनी चेकबुक नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाची ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांना टंचाई पीक अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार २८ गावांना टंचाई पीक अनुदान देण्याची पुरंदर तहसील विभागाकडून शासनाकडे सुमारे ९ कोटी ५५ लाख एक हजार ४ रुपयांची मागणी केली होती. यापैकी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. उर्वरित रक्कम केवळ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न मिळाल्याने माघारी गेली आहे. शेतकऱ्याना देय रक्कम शासकीय ट्रेझरीत जमा असून ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नाही. दोन महिन्यांपूर्वी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे तसेच पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी या टंचाई अनुदानवाटपाचा मोठा गाजावाजा करीत काही गावांतून कार्यक्रम घेतले. काही रकमेचे प्रतीकात्मक चेकही वाटप केले. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील रक्कम अजूनही मिळालेली नाही. टंचाई अनुदानवाटपाचा कार्यक्रम होऊन दोन महिने उलटले, तरीही रक्कम जमा झालेली नाही. शेतकऱ्यासमोर गंभीर प्रश्न असताना ही रक्कम मिळणे आवश्यक होते. गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. > १४ गावे : रब्बीच्या वाटपाचीही प्रतीक्षारब्बी हंगामाची ५० पेक्षा कमी पैसेवारी लागलेल्या गावांची ही टंचाई पीक अनुदानासाठी पात्र यादी तयार करण्यात आली होती. तसे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. यात पांडेश्वर, मावडी क. प., कर्नलवाडी, राजेवाडी, आंबळे, माळशिरस, टेकवडी, पोंढे, गुरोळी, वाघापूर, राजुरी, रिसे, पिसे, नायगाव ही १४ गावे जाहीर करण्यात आलेली आहेत. त्या गावांचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, त्या गावांना टंचाई अनुदान देण्याबाबत शासकीय पातळीवरून काहीच निर्णय झालेला नसल्याचे समजते. याही गावांना शासनाकडून टंचाई अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे.गावाचे नाव व कंसात अनुदान रक्कम वाल्हे (१२७१६२७), जेजुरी (६१५९४७४), कोळविहिरे (२६३४९२०), नावळी (६७८८८०), दौंडज (१४०५३००) राख (३४१३०६७), पिंगोरी (८९४३६०), पिंपरी (४४९२४५४), साकुर्डे (५७२१७३६), शिवरी (६४८५७७६), तक्रारवाडी (५४५३१६), परींचे (७४१६१३२), हरणी (२८७७७८४), मांढर (४३५२९१२), धनकवडी (१०७२४३४), दवणेवाडी (७२०६६४), पांगारे (१४२३०९२), पिंपळे (३३४१३९६), हरगुडे (१३४०१५२), बोरहाळवाडी (२९९८५४०), खेंगरेवाडी (५३१२४०), शिंदेवाडी (७२४२६४), घेरा पुरंदर (७९८४१७), मिसाळवाडी (२०९९६०), काळदरी (२८३६६२०), चिव्हेवाडी (१८२८४०), भैरावाडी (४४२७४०) आणि बांदलवाडी (८४६३५६).