शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune: सौर कृषी वाहिनीला दोन महिन्यांतच १० टक्के जमीन, दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी योजना

By नितीन चौधरी | Updated: July 13, 2023 16:48 IST

दोन महिन्यांतच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे...

पुणे : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.० राबविण्यात येत असून पुणे प्रादेशिक विभागात डिसेंबर २०२५ अखेर ५ हजार ८६८ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. यासाठी तब्बल २९ हजार ३९३ एकर जमिनीची आवश्यकता असून विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे २ हजार ७०० एकर जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांतच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागासाठी डिसेंबर २०२५ अखेर ५ हजार ८६८ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एकूण २९ हजार ३९३ एकर जमिनीची आवश्यकता आहे. ही योजना २३ एप्रिलला जाहीर करण्यात आली. त्यानुसार पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ८७७ एकर शासकीय जमीन उपलब्ध झाली आहे. तर ६०४ शेतकऱ्यांनी जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी अर्ज केले असून यापैकी १४१ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यातून १ हजार ८२३ एकर जागा मिळणार आहे. तर उर्वरित अर्जांवर कारवाई सुरू आहे.

योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, अधिकारी व शेतकऱ्यांना भेटून योजनेचा प्रसार करावा, असे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना नुकतेच दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी व वेगवान अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी सरकारी व खाजगी जमिनीची उलब्धता युद्धपातळीवर करण्याकरीता तात्काळ कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

तांत्रिक कारणांमुळे कृषीपंपांना दिवसा आणि रात्री असा वीजपुरवठा केला जातो. रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या योजनेमुळे शेतीसाठी दिवसा आठ तास भरवशाचा वीजपुरवठा होणार असून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.

जिल्हानिहाय उद्दीष्ट

जिल्हा उद्दीष्ट        (मेगावॅट)          जमीन (एकरमध्ये)

पुणे                       १९७५             ९९२८सातारा                 ६८७             ३४४४

सोलापूर               २०३४             १०१७०कोल्हापूर              ३४०             १७२०

सांगली                ८३२             ४१३१

या योजनेनुसार सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पडीक जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे.

- अंकुश नाळे, संचालक, पुणे प्रादेशिक विभाग

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChief Ministerमुख्यमंत्री