शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:15 IST

................ संसारात अनेक वर्षापासून प्राणी परिभ्रमण करत आहेत. मानवाला अनेक वर्षापासून क्रोधापासून मुक्तता हवी आहे. क्रोध हा अग्नीप्रमाणे असतो. ...

................

संसारात अनेक वर्षापासून प्राणी परिभ्रमण करत आहेत. मानवाला अनेक वर्षापासून क्रोधापासून मुक्तता हवी आहे. क्रोध हा अग्नीप्रमाणे असतो. एका क्षणात सर्व काही नष्ट करतो. मानवाला चांगले कार्य करण्यासाठी अनेक वर्ष लागतात, पण क्रोध मात्र काही मिनिटांत अनेक वर्ष कमावलेले गमावतो. क्रोधामुळे माणसाचे स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणे जाते व त्याच्या हातून चुका घडू लागतात व मग त्याला या चुकांचे परिणाम भोगावे लागतात. क्रोध हे अनर्थाचे मुळ आहे. मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा शत्रू हा क्रोध आहे. जेव्हा मानवास क्रोध येतो त्या वेळेस त्यांचे सर्व हावभाव, भाषा बदलते. क्रोधीत मानव क्रोधात अनेक चुकीच्या गोष्टी बोलून जातो. क्रोध हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. क्रोधाची सुरूवात मुर्खतेने होते व शेवट पश्चातापाने होतो.

क्रोध जर नकारात्मकतेमुळे निर्माण झाला असेल, तर कुठलीही व्यक्ती त्या क्रोधावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, कारण क्रोध ही "फलश्रुती" आहे. कुठल्या कारणांनी तुम्हाला राग येतो, क्रोध येतो, त्या कारणांना शोधून काढणे अतिशय गरजेचे आहे. लक्षात घ्या, "कारण" नष्ट केले म्हणजे "परिणाम" नष्ट होऊ लागतात आणि तुमच्या "क्रोधाचे" कारण होय. तुमच्या "चित्तातील नकारात्मक प्रवाह"जर तुम्ही नकारात्मक वृत्तीचे असाल, तर परिणाम स्वरूप तुम्हाला नेहमीच क्रोध येत राहील, परंतु जर तुम्ही सकारात्मक वृत्तीचे बनलात, तर आपोआपच तुमच्या नकारात्मकतेला आळा घातला जाईल. म्हणून तुम्ही क्रोधावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा क्रोध निर्माण होण्याचे मूळ कारण असलेल्या तुमच्या "नकारात्मक वृत्तीवर" नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक वृत्तीला नष्ट करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम नकारात्मक विचार करणे, बोलणे व ऐकणे बंद करा.

- प्रवर्तक तारकऋषिजी महाराज