शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

संस्कारपुष्प १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST

जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली ...

जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली होती की, या जगातील प्रत्येक आत्मा समान आहे आणि जो त्याची आंतरिक शक्ती जाणून घेऊन जागृत होतो तो परमात्मा बनू शकतो. ते कर्मविज्ञानाचे प्रवर्तक होते. त्यांनी सांगितले की, तुमचे खरे जग तुमच्यामध्ये आहे, जर तुम्हाला जग बदलायचे असेल तर स्वतःला बदला. हे जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. एका झाडाची ब्लूप्रिंट त्याच्या बीजामध्ये असते. त्याचप्रकारे आपण अनुभवत असलेल्या बाह्य घटनांची ब्लूप्रिंट आपल्या आतमध्ये असते. त्यालाच कर्म म्हणतात. कर्माचा स्वभाव आत्म्याच्या सामर्थ्यावर परिणाम करणे आहे. त्या कर्माला निष्फळ होण्यास धर्म मदत करू शकतो. त्यांनी धर्माची वैज्ञानिक व्याख्या ‘वत्थुसहावो धम्मो’ अशी प्रस्तुत केली. कोणत्याही पदार्थाचे आपल्या मूळ स्वभावामध्ये असणे हा त्याचा धर्म आहे. धर्माला व्यवहाराचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली त्यालाच जैन धार्मिक भाषेत ‘संघ’ म्हटले जाते. आपल्या जिवंत आचरणाच्या माध्यमातून दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी दुःख सहन करण्याचा आदर्श त्यांनी प्रस्तुत केला. यासाठी जग त्यांचे सदैव ऋणी राहील.

- गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज