शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संस्कारपुष्प १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

..................................... भगवान महावीरांनी अहिंसेला प्राणीमात्रांशी मैत्रीचे सूत्र असे सांगितले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’. मैत्री हा शब्द स्नेह, प्रेम, करुणा, दया, ...

.....................................

भगवान महावीरांनी अहिंसेला प्राणीमात्रांशी मैत्रीचे सूत्र असे सांगितले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’. मैत्री हा शब्द स्नेह, प्रेम, करुणा, दया, अनुकंपा आणि सेवेशिवाय अर्थपूर्ण असू शकत नाही. महावीरांनी मैत्रीच्या अंतर्भावाला खूपच व्यापकपणे पाहिले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’ला ‘वेरं मज्झं ण केणई’शी देखील जोडले. म्हणजे, मी सर्व जिवांशी मैत्री करतो. त्याचबरोबर माझे कोणाशीही वैर नाही. ही मैत्रीभावना फक्त मानवी जगापुरती मर्यादित नाही, असेही ते सुचवतात.

अहिंसा आणि मैत्री एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अहिंसा मैत्रीचा विस्तार आहे आणि मैत्री अहिंसेचा विस्तार आहे. सर्व धर्मांमध्ये अहिंसेची अवधारणा बीज स्वरूपात आढळते. यहुदी धर्मग्रंथामध्ये दहा आज्ञा नमूद केल्या आहेत त्यामध्ये तुम्ही कोणाचीही हत्या करू नका याचा उल्लेख आहे. जैनधर्म या गोष्टीच्यापुढे जाऊन असे म्हणत आहे- सव्वे सत्ता ण हंतव्वा....

परंपरेच्या प्रवाहात, अहिंसेचा शाब्दिक अर्थ केवळ हिंसा न करणे हाच झाला आहे. वास्तविक अहिंसेचा मूळ आधार करुणा, वात्सल्य आणि अनुकंपेपेक्षाही अधिक आहे. पृथ्वी, पाणी, वनस्पती, वायू, अग्नी यांच्या विनाशालासुद्धा जैन तत्त्वज्ञान हिंसा मानते. आपण हे देखील विसरून चालणार नाही की मानवी चेतना आणि विविध प्रकारची संवेदनशीलता अहिंसेच्या व्यापक अर्थाने प्रकट झाली आहे. जितकी अधिक संवेदनशीलता विस्तृत होईल, अहिंसेचा अर्थविकास तितका विकसित होईल.

- ʻअणुʼ शिष्य जिनेंद्रमुनीजी महाराज

(फोटो नाही)