शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

संस्कारपुष्प १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

..................................... भगवान महावीरांनी अहिंसेला प्राणीमात्रांशी मैत्रीचे सूत्र असे सांगितले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’. मैत्री हा शब्द स्नेह, प्रेम, करुणा, दया, ...

.....................................

भगवान महावीरांनी अहिंसेला प्राणीमात्रांशी मैत्रीचे सूत्र असे सांगितले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’. मैत्री हा शब्द स्नेह, प्रेम, करुणा, दया, अनुकंपा आणि सेवेशिवाय अर्थपूर्ण असू शकत नाही. महावीरांनी मैत्रीच्या अंतर्भावाला खूपच व्यापकपणे पाहिले- ‘मित्ति मे सव्वभूएसु’ला ‘वेरं मज्झं ण केणई’शी देखील जोडले. म्हणजे, मी सर्व जिवांशी मैत्री करतो. त्याचबरोबर माझे कोणाशीही वैर नाही. ही मैत्रीभावना फक्त मानवी जगापुरती मर्यादित नाही, असेही ते सुचवतात.

अहिंसा आणि मैत्री एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अहिंसा मैत्रीचा विस्तार आहे आणि मैत्री अहिंसेचा विस्तार आहे. सर्व धर्मांमध्ये अहिंसेची अवधारणा बीज स्वरूपात आढळते. यहुदी धर्मग्रंथामध्ये दहा आज्ञा नमूद केल्या आहेत त्यामध्ये तुम्ही कोणाचीही हत्या करू नका याचा उल्लेख आहे. जैनधर्म या गोष्टीच्यापुढे जाऊन असे म्हणत आहे- सव्वे सत्ता ण हंतव्वा....

परंपरेच्या प्रवाहात, अहिंसेचा शाब्दिक अर्थ केवळ हिंसा न करणे हाच झाला आहे. वास्तविक अहिंसेचा मूळ आधार करुणा, वात्सल्य आणि अनुकंपेपेक्षाही अधिक आहे. पृथ्वी, पाणी, वनस्पती, वायू, अग्नी यांच्या विनाशालासुद्धा जैन तत्त्वज्ञान हिंसा मानते. आपण हे देखील विसरून चालणार नाही की मानवी चेतना आणि विविध प्रकारची संवेदनशीलता अहिंसेच्या व्यापक अर्थाने प्रकट झाली आहे. जितकी अधिक संवेदनशीलता विस्तृत होईल, अहिंसेचा अर्थविकास तितका विकसित होईल.

- ʻअणुʼ शिष्य जिनेंद्रमुनीजी महाराज

(फोटो नाही)