शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

संदीपने जीवनयात्रा संपवली आणि तो पास झाला...

By admin | Updated: May 26, 2016 03:33 IST

बारावी निकालाच्या धसक्याने निमगाव-खंडोबा (ता. खेड) येथील संदीप ज्ञानेश्वर शिंदे (वय २१) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणिताच्या पेपरात नापास

राजगुरुनगर : बारावी निकालाच्या धसक्याने निमगाव-खंडोबा (ता. खेड) येथील संदीप ज्ञानेश्वर शिंदे (वय २१) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणिताच्या पेपरात नापास होण्याच्या भीतीने त्याने हे पाऊल उचलले. मात्र, तो ५४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शिंदे याने बारावीची परीक्षा दिली होती. आज निकाल होता, पण आपण नापास होऊ या भीतीने तो सकाळी सहा वाजताच घराबाहेर पडला. शेतात कामासाठी गेला असेल असे आई-वडिलांना वाटले. मात्र, त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली. आपल्या शेतातील छपराच्या वाश्यास दोर लावून त्याने आपले जीवन संपविले. सकाळी आठच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निमगाव येथेच त्याचा अंत्यविधी झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा अतिशय शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याचे वडील निमगावला पोस्टमन आहेत. त्याला एक लहान बहीण असून तो आईवडिलांना एकटाच मुलगा होता. राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून त्याने बारावी सायन्सची परीक्षा यापूर्वी दोनदा दिली होती. मात्र, दोन्हीवेळा तो नापास झाल होता. त्याचा गणित हा विषय राहिला होता. तो पुन्हा सर्व विषय घेवून परीक्षल्ौा बसला होता. गणिताचा पेपर अवघड गेल्याने या वेळीही आपण नापास होऊ, या धास्तीने त्याने आज आपले जीवन संपविले. संदीप सर्व विषय घेवून बारावीच्या परीक्षेला बसला होता. तो ५४ टक्के गूण मिळवून उत्तीर्ण झाला असल्याचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. पाटील यांनी लोकमशी बोलताना सांगितले.