शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पानिपत शौर्यदिनी वीरांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST

पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धानंतर कोणत्याही परकीय शक्तींनी खैबर खिंडीतून भारतात घुसण्याची ...

पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धानंतर कोणत्याही परकीय शक्तींनी खैबर खिंडीतून भारतात घुसण्याची हिंमत केली नाही. पानिपत घडले नसते तर इतिहास वेगळा असता असे म्हटले जाते. आपल्या पूर्वजांना ज्या भूमीत वीरगती प्राप्त झाली, त्या रणांगणातील माती असलेल्या कलशाचे पूजन करून ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने पानिपतच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या वीरांना मानवंदना दिली.

या प्रसंगी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सूर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा, यांच्यासह संदीप मोहिते पाटील, गणेश सातपुते, तळबीडचे सरपंच नाना मोहिते पाटील उपस्थित होते. या प्रसंगी चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, जयेश संघवी, विनोद सातव यांनी वीरांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अभ्यासक सौरभ कर्डे यांनी, तर सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.