माणसांच्या औषध विक्रीच्या मेडिकल स्टोअरमध्ये मुरघासाची बॅग विकण्यास परवानगी आहे का? आणि असेल तर बॅग खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना बिल मिळत नाही? शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन अडवणूक करुन चढ्या भावाने विकले जात आहेत. बॅगेवर कोणत्याही प्रकारची छापील किंमत नसल्यामुळे अधिकचा नफा मिळवण्यासाठी ७०० रूपयांपर्यंत स्वत:च किमती ठरवून आणि लोकल कंपनीच्या बॅग आणून नामांकित कंपनीचे छाप मारून विक्री करुन शेतक-याची अतोनात लुट करत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी सुरवातीच्या लॉकडाऊनच्या काळात शेतकरी स्वप्निल जराड यांची अडवणूक करुन व कोणत्याही प्रकारे बिल न देता ७०० रूपयांना चढ्या भावाने बॅग विक्री करण्यात आली.
संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांची अशाप्रकारे होणारी लूट लवकरात लवकर थांबली पाहिजे.
जयराज बागल
(उपाध्यक्ष,भा.ज.पा युवा मोर्चा)
ग्रामिण भागात दुष्काळ,अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असता अशा प्रकारे शेत-यांची लूट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन शेतकऱ्यांची होणारी लूट तत्काळ थांबवी.
अजित जराड
(ग्रामस्थ, उंडवडी कडेपठार)