शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

एका तृतीयपंथीचा संघर्ष सन्मानासाठी...

By admin | Updated: February 17, 2017 04:27 IST

’ते’ ही समाजाचे एक घटक आहेत. त्यांनाही मानसन्मान मिळायला हवा, पण त्यांच्या वाट्याला येते ती तुच्छतेची वागणूक.

नम्रता फडणीस/राहुल गायकवाड य पुणे’ते’ ही समाजाचे एक घटक आहेत. त्यांनाही मानसन्मान मिळायला हवा, पण त्यांच्या वाट्याला येते ती तुच्छतेची वागणूक. त्यांचे आर्शिवाद मिळण्यासाठी शुभकार्यात त्यांना आमंत्रित तर केले जाते मात्र इतर दिवशी त्यांची सावलीही नको असते. तृतीयपंथीयांनाही इतरांसारखी सन्मानाची वागणूक मिळवून देण्याच्या संघर्षातून ताडीवाला रोड प्रभागात सुषमा विधाते या तृतीयपंथी उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्याजवळ ना पुरेसा पैसा आहे ना म्हणावे तसे मनुष्यबळ. गेल्या आठ वर्षांपासून कर्जदार-जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या महिला अध्यक्ष म्हणून केलेले सामाजिक कार्याचे संचित आणि आपल्या सतरा चेल्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीतून मिळालेले आर्थिक पाठबळ यातून निवडणूक लढविण्याच्या दिशेने त्यांनी संघर्षमयी पाऊल टाकले आहे, ते आपल्या तृतीयपंथी समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी. गुरूवारी लोकमत प्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत प्रचारात सहभागी होऊन त्यांचे भावविश्व जाणून घेतले .पैशाअभावी दोन दिवस त्यांचा प्रचार थांबला होता पण चेह-यावर त्याचा कुठेही लवलेश जाणवत नव्हता..लगेचच कुणालातरी महिलांना बोलावण धाडण्यास त्यांनी सांगितलं आणि दोन मिनिटात त्यांच्या चेल्यांसह आसपासच्या बायका जमा झाल्या..गळ्यात उपरण घालून घरोघरी त्या प्रचाराला जाण्यास सज्ज झाल्या..भाऊ, ताई .एकदा फक्त आम्हाला संधी देऊन बघा...असे भावनिक आवाहन त्या करीत होत्या..काही बायकांनी उपरण हातात ठेवली होती, त्यावर का लाज वाटते का आमचे उपरणं घालायची, असेही त्या ठणकावत होत्या..आजवर एकाही पक्षाने आमचा विचार केला नाही. का ,आमची लाज वाटते का? आम्ही काय माणूस नाही का? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. आजवर स्वत:च्या हिंमतीवर मी उभे राहिले आहे, हे सांगताना त्यांच्या वाणीत दाहकता पण डोळ्यात विषण्णता दाटली होती. खूप काही सांगायचे होते. पण शब्दांमध्ये मौनाचे मळभ दाटले होते. मला पोलिस इन्पेक्टर नाहीतर डॉक्टर बनायची खूप इच्छा होती. काहीतरी बनायचे होते. एका आॅफिसमध्ये कामासाठी गेले तर मला दहा रूपये देऊन बाहेर पाठविण्यात आले. त्यांनी माझी लायकी दाखविली की तुम्ही भीक मागूनच खा, पण भीक मागितली तर पोलिस त्रास देतात, ३९४ ची दरोडा केस पोलिसांनी टाकली..पन्नास रूपयांचा दरोडा असू शकतो का? भीकही मागून देत नाहीत आणि कामही करून देत नाही मग आम्ही जगायचे तरी कसे? असा सवाल सुषमा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (वार्ताहर)