शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांचा आवाज होण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा होता प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

पुणे : साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या काव्यातून, गीतांतून सातत्यान समाजातील वंचित शोषित गरीबांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वांना ...

पुणे : साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या काव्यातून, गीतांतून सातत्यान समाजातील वंचित शोषित गरीबांचा आवाज होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वांना किमान दोन वेळेचे पोटभर अन्न मिळावे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी सातत्याने काव्यातून गीतांतून आवाज उठविला. त्यांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत भाष्य करावयाचे झाल्यास साहिर लुधीयानवी आर्थिक न्यायाचे उद्घोषक होते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

बलराज सहानी - साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे साहिर लुधियानवी जन्मशताब्दी निमित्त देण्यात

येणा-या पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यंदाचा साहिर लुधियानवी पुरस्कार नामवंत अर्थशास्त्रज्ञ आणि लेखक डाॅ. आशुतोष रारावीकर यांना प्रदान करण्यात आला तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमाबी शेख पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या स्वलेहा एजाज हक यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने पुण्यात स्थापन झालेल्या स्मशान फंड कमिटीत सक्रिय असलेले कमांड हाॅस्पिटलचे आरोग्य सेवा कामगार ज्ञानेश्र्वर माने व सुलोचना डांगे यांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर बलराज सहानी- साहिर लुधियानवी फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर, शिवानी हरिश्चंद्रे , स्मशान फंड कमिटीशी संबंधित सोमेश्र्वर गणाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, साहिर लुधियानवी हे कृतीशील शायर होते. त्यांनी वेळोवेळी जाहीर भूमिका घेतल्या होत्या. ते त्यांच्या शेवटच्या काळात व्हिलचेअरवर होते. परंतु त्याही परिस्थितीत ते गरिबांच्या, स्त्रियांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले. साहिर लुधियानवी हे आर्थिक न्यायाचे समर्थक होते. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित झाली पाहिजे या विचारांवर त्यांचा भर होता. ऐसा मिले समाज सबको मिले अनाज हे त्यांच्या जगण्याचे तत्वज्ञान होते.

डाॅ. आशुतोष रारावीकर, स्वलेहा एजाज हक यांनी मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर यांनी प्रास्ताविक केले तर कृपाशंकर शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.