शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा फडकला भगवा

By admin | Updated: May 17, 2014 06:08 IST

मावळ हा आपला बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना आजच्या निकालाने मोठाच धक्का दिला आहे

 मावळ हा आपला बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना आजच्या निकालाने मोठाच धक्का दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात आणि हाक देताच हजारो कार्यकर्ते पुढ्यात अशा ठेक्यात वावरणार्‍या राष्टÑवादी काँग्रेसला मतदारांनी पार तिसर्‍या क्रमांकावर फेकले. हे नाकारलेपण काका-पुतण्यांनी स्वत:हून ओढवून घेतले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने सलग दुसर्‍यांदा भगवा फडकावत आपली ताकद पाचपट केली आहे. याला साथ मोदी लाटेची असली, तरी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली एकजुट महत्त्वाची ठरली आहे. शेतकरी कामगार पक्ष व महाराष्टÑ नवनिर्माण सेना या पक्षांंचे अस्तित्व, तर नगण्य असल्याचेही या निकालातून दिसते आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागले होते. याची अनेक कारणे ठरली; पण यातील काहींचा विचार करायचा झाला, तर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये लागलेला सुरूंग! ‘मावळचा खासदार’ म्हणून आमदार लक्ष्मण जगताप हे नाव तीन वर्षांपूर्वीच पक्षाने ठरविले होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि जगताप यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. यासाठी कारण देताना त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न महापालिकेतील व राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून राष्टÑवादीने सोडविला नाही, असा आरोपही केला. त्यांच्या उमेदवारीच्या नकाराने पक्षाची धावपळ उडाली. कारण, उमेदवारी स्वीकारण्यास पुढे कोणीच येईना. ‘उमेदवारी घ्या हो,’ अशी विनंतीही अजित पवारांना करावी लागली, तरीही कोणीही तयारी दर्शविली नाही. यामागील कारण म्हणजे काका-पुतण्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दाखविलेला अविश्वास. ही त्यांच्या पराभवाची पहिली पायरी ठरली. बारणे यांच्या विजयात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली प्रचंड एकजुट महत्त्वाची ठरली. बारणे सुरुवातीपासून अनधिकृत बांधकामधारकांच्या पाठीशी राहिले. त्यांच्यासाठी सतत महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत आंदोलने केली. स्थानिक पातळीवर सामान्य माणसामध्येही त्यांची अतिशय चांगली प्रतिमा राहिली. कोठेही डाग नसल्याचा लाभ त्यांना झाला. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत त्यांनी मोठा संपर्क वाढविला होता. याचा फायदा त्यांना झाला. ऐन निवडणुकीत विद्यमान खासदार गजानन बाबर व त्यांच्या गटाने शिवसेना सोडली होती. तरीही राष्टÑवादीला कंटाळलेले, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर नाराज असलेले, आता बदल हवा, असा मोठा मतप्रवाह तयार झाला होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला होता. मतदान झाल्या दिवसापासून त्यांच्याच विजयाविषयी सर्वत्र चर्चा होती. सार्‍यांना प्रतीक्षा केवळ मोदी लाटेमुळे त्यांना किती मताधिक्य मिळणार याची! यातूनच सहाही विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर राहून तब्बल १ लाख ५७ हजार ३९७ मताधिक्यांनी ते विजयी झाले.