शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा फडकला भगवा

By admin | Updated: May 17, 2014 06:08 IST

मावळ हा आपला बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना आजच्या निकालाने मोठाच धक्का दिला आहे

 मावळ हा आपला बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना आजच्या निकालाने मोठाच धक्का दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात आणि हाक देताच हजारो कार्यकर्ते पुढ्यात अशा ठेक्यात वावरणार्‍या राष्टÑवादी काँग्रेसला मतदारांनी पार तिसर्‍या क्रमांकावर फेकले. हे नाकारलेपण काका-पुतण्यांनी स्वत:हून ओढवून घेतले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने सलग दुसर्‍यांदा भगवा फडकावत आपली ताकद पाचपट केली आहे. याला साथ मोदी लाटेची असली, तरी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली एकजुट महत्त्वाची ठरली आहे. शेतकरी कामगार पक्ष व महाराष्टÑ नवनिर्माण सेना या पक्षांंचे अस्तित्व, तर नगण्य असल्याचेही या निकालातून दिसते आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागले होते. याची अनेक कारणे ठरली; पण यातील काहींचा विचार करायचा झाला, तर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये लागलेला सुरूंग! ‘मावळचा खासदार’ म्हणून आमदार लक्ष्मण जगताप हे नाव तीन वर्षांपूर्वीच पक्षाने ठरविले होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि जगताप यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. यासाठी कारण देताना त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न महापालिकेतील व राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून राष्टÑवादीने सोडविला नाही, असा आरोपही केला. त्यांच्या उमेदवारीच्या नकाराने पक्षाची धावपळ उडाली. कारण, उमेदवारी स्वीकारण्यास पुढे कोणीच येईना. ‘उमेदवारी घ्या हो,’ अशी विनंतीही अजित पवारांना करावी लागली, तरीही कोणीही तयारी दर्शविली नाही. यामागील कारण म्हणजे काका-पुतण्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दाखविलेला अविश्वास. ही त्यांच्या पराभवाची पहिली पायरी ठरली. बारणे यांच्या विजयात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेली प्रचंड एकजुट महत्त्वाची ठरली. बारणे सुरुवातीपासून अनधिकृत बांधकामधारकांच्या पाठीशी राहिले. त्यांच्यासाठी सतत महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत आंदोलने केली. स्थानिक पातळीवर सामान्य माणसामध्येही त्यांची अतिशय चांगली प्रतिमा राहिली. कोठेही डाग नसल्याचा लाभ त्यांना झाला. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत त्यांनी मोठा संपर्क वाढविला होता. याचा फायदा त्यांना झाला. ऐन निवडणुकीत विद्यमान खासदार गजानन बाबर व त्यांच्या गटाने शिवसेना सोडली होती. तरीही राष्टÑवादीला कंटाळलेले, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर नाराज असलेले, आता बदल हवा, असा मोठा मतप्रवाह तयार झाला होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला होता. मतदान झाल्या दिवसापासून त्यांच्याच विजयाविषयी सर्वत्र चर्चा होती. सार्‍यांना प्रतीक्षा केवळ मोदी लाटेमुळे त्यांना किती मताधिक्य मिळणार याची! यातूनच सहाही विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर राहून तब्बल १ लाख ५७ हजार ३९७ मताधिक्यांनी ते विजयी झाले.