शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पूर्व हवेलीत होणाऱ्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:10 IST

ग्रामीण भागात सुरुवातीला ही बाब नागरिकांनी, तसेच प्रशासनाने गांभीर्याने घेतली. परंतु, आता या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. पूर्व ...

ग्रामीण भागात सुरुवातीला ही बाब नागरिकांनी, तसेच प्रशासनाने गांभीर्याने घेतली. परंतु, आता या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. पूर्व हवेलीत होणाऱ्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती,,लोणी काळभोर,,उरुळी कांचन अशा ठिकाणी सर्वत्र लग्नसराई जोरात सुरू असून प्रशासनाची परवानगी काढून विवाह सोहळे पार पडत आहेत. लग्न समारंभात वधू आणि वर पक्षाकडून ५० नागरिकांच्या उपस्थितीबाबत काही नियम प्रशासनाकडून दिलेले आहेत. परंतु सध्या होणाऱ्या लग्नसराईमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. याठिकाणी होणारे हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्यांत हरताळ फासला जात आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी परवानगीच्या क्षमतेहून अधिक संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. लॉक डाऊनपूर्वी जशी लग्नात गर्दी असायची तेच चित्र पुन्हा पूर्व हवेलीत दिसू लागले आहे. कदमवाकवस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसराईत कार्यालयाबाहेर लावलेल्या अस्ताव्यस्त गाड्यांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कारवाई मात्र काही झाली नाही. काही लग्नात तर वाजंत्रीच दहा ते पंधरा जण असतात. मग ५० जणांचा नियम कसा राबविला जाईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.