शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

आरटीई प्रवेश विद्यार्थ्यांपासून दूरच

By admin | Updated: May 4, 2015 03:26 IST

आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकातील विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हक्क कायद्या’अंतर्गत (आरटीई) आरक्षित २५ टक्के जागांवर प्रवेश देणे

पुणे : आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकातील विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हक्क कायद्या’अंतर्गत (आरटीई) आरक्षित २५ टक्के जागांवर प्रवेश देणे बंधनकारक असताना, शासनाच्या अनास्थेमुळे पुण्यातील साडेपाच हजारांहून अधिक विद्यार्थी आजही आपल्या हक्कापासून वंचित आहेत. त्यात पूर्व प्राथमिक वर्गात आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा दिला जाणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागील वर्षी आरटीईनुसार प्रवेशित झालेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरही गदा आली आहे.प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीईच्या प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारून पात्र विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले. शासनाकडून आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा मिळणार असल्यामुळे शाळांनीही प्रवेश दिले. मात्र, शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळणार नसल्याने काही शाळांनी विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांचे शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच सध्या आरटीई अंतर्गत ४४९ शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. परंतु, काही शाळांना दोन एंट्री पॉइंट असल्यामुळे ७८३ शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार ११ हजार २०१ प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ हजार ३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असून, २,१०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले आहेत, तर आजही ५,७१२ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आरटीईचे प्रवेश केवळ पहिलीसाठी द्यावेत, असा अध्यादेश शिक्षण विभागाने काढल्यामुळे प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल करणे उचित होणार आहे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.