शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाचे एसएमएस १५ एप्रिलपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:11 IST

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाची सोडत बुधवारी काढण्यात आली. येत्या १५ ...

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाची सोडत बुधवारी काढण्यात आली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती कळविली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणा-या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने लॉटरी काढली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक व राज्याचे प्राथमिक सहसंचालक दिनकर टेमकर, राज्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, आरटीई राज्य समन्वयक गीता जोशी, सुरेखा खरे,पुणे मनपा आरटीई समन्वयक वैशाली पांढरे, पुणे विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे उपस्थित होते.

शिक्षण विभागाने ऑनलाईन लॉटरीची प्रक्रिया सुरू केली असून दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार हे पाहण्यासाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून पालकांनी प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

लॉटरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेर गावी असतील तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॅट्स अ‍ॅप च्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही समितीशी संपर्क न साधणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रतिक्षा यादीतील पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये, असे दिनकर टेमकर यांनी सांगितले.

---

अभिनव स्कूलला सर्वाधिक पसंती

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नळ स्टॉप परिसरातील अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलला राज्यात सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या ८० जागांसाठी १ हजार ८३० तर इयत्ता पहिलीच्या जागांसाठी १ हजार ४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी ३ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.