शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

आरटीई प्रवेशाचे एसएमएस १५ एप्रिलपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:11 IST

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाची सोडत बुधवारी काढण्यात आली. येत्या १५ ...

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाची सोडत बुधवारी काढण्यात आली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे प्रवेशाची माहिती कळविली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणा-या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने लॉटरी काढली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक व राज्याचे प्राथमिक सहसंचालक दिनकर टेमकर, राज्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, आरटीई राज्य समन्वयक गीता जोशी, सुरेखा खरे,पुणे मनपा आरटीई समन्वयक वैशाली पांढरे, पुणे विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सुनील कुऱ्हाडे उपस्थित होते.

शिक्षण विभागाने ऑनलाईन लॉटरीची प्रक्रिया सुरू केली असून दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार हे पाहण्यासाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून पालकांनी प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

लॉटरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेर गावी असतील तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॅट्स अ‍ॅप च्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही समितीशी संपर्क न साधणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. तसेच एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रतिक्षा यादीतील पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये, असे दिनकर टेमकर यांनी सांगितले.

---

अभिनव स्कूलला सर्वाधिक पसंती

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नळ स्टॉप परिसरातील अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलला राज्यात सर्वाधिक पसंती मिळाली आहे. शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या ८० जागांसाठी १ हजार ८३० तर इयत्ता पहिलीच्या जागांसाठी १ हजार ४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी ३ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.