शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

आरटीई प्रवेशास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जुलैपर्यंत ...

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात ४६ हजार ३७१ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित झाले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील ७ हजार ८५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असून, राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने २ लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले. त्यात प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाइन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना सध्या शाळा स्तरावर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने १० जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली होती. परंतु, केवळ ५० टक्के प्रवेश झाल्याने शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी आरटीई प्रवेशावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये आरटीई प्रवेश होत नाहीत. सुमारे पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी, राज्यात केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेश मिळाला आहे. परिणामी या शाळांची समजूत काढल्याशिवाय उर्वरित प्रवेश होणार नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळांची समजूत काढली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

-----------

आरटीई अंतर्गत विविध जिल्ह्यांत झालेले प्रवेश

अहमदनगर १९१९, अकोला १,३५४, अमरावती १०२१, औरंगाबाद १९४२, भांडारा ५६५, बीड १,०३०, बुलडाणा १,२७४, चंद्रपूर १०२५, धुळे ७७३, गडचिरोली ३७०, गोंदिया ५९६, हिंगोली २९५, जळगाव २१५७, जालना ७३८, कोल्हापूर १०६३, लातूर ८२३, मुंबई १६९२, नागपूर १८८९, नांदेड ६९६, नंदुरबार २१७, नाशिक २,७७५, उस्मानाबाद ३११, पालघर १,०९२, परभणी ४२६, पुणे ७,६२३, रायगड २,५२१, रत्नागिरी ५२१, सांगली ७४८, सातारा ४७०, सिंधुदुर्ग १६७, सोलापूर ९१४, ठाणे ४,८८८, वर्धा ८२२, वाशीम ३३०, यवतमाळ ८२१.