शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

आरटीई प्रवेशास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जुलैपर्यंत ...

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात ४६ हजार ३७१ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित झाले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील ७ हजार ८५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असून, राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने २ लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले. त्यात प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाइन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना सध्या शाळा स्तरावर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने १० जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली होती. परंतु, केवळ ५० टक्के प्रवेश झाल्याने शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी आरटीई प्रवेशावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये आरटीई प्रवेश होत नाहीत. सुमारे पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी, राज्यात केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेश मिळाला आहे. परिणामी या शाळांची समजूत काढल्याशिवाय उर्वरित प्रवेश होणार नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळांची समजूत काढली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

-----------

आरटीई अंतर्गत विविध जिल्ह्यांत झालेले प्रवेश

अहमदनगर १९१९, अकोला १,३५४, अमरावती १०२१, औरंगाबाद १९४२, भांडारा ५६५, बीड १,०३०, बुलडाणा १,२७४, चंद्रपूर १०२५, धुळे ७७३, गडचिरोली ३७०, गोंदिया ५९६, हिंगोली २९५, जळगाव २१५७, जालना ७३८, कोल्हापूर १०६३, लातूर ८२३, मुंबई १६९२, नागपूर १८८९, नांदेड ६९६, नंदुरबार २१७, नाशिक २,७७५, उस्मानाबाद ३११, पालघर १,०९२, परभणी ४२६, पुणे ७,६२३, रायगड २,५२१, रत्नागिरी ५२१, सांगली ७४८, सातारा ४७०, सिंधुदुर्ग १६७, सोलापूर ९१४, ठाणे ४,८८८, वर्धा ८२२, वाशीम ३३०, यवतमाळ ८२१.