शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट मग ते अतिवृष्टी, कोरोना किंवा देशाच्या सीमेवर आलेले संकट असो ते दूर करण्याचे काम हे त्या त्या क्षेत्रातील सैनिक करीत असतात. कोणतेही काम हे प्रसिद्धीसाठी किंवा अपेक्षा न ठेवता करीत राहायचे, अशा भूमिकांमधूनच समाजासमोर आदर्श निर्माण होतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

सरहद्द संस्थेकडून कारगिल प्रदेशाशी जोडल्या गेलेल्या मुला-मुलींना पुण्यात आणून शिक्षण देण्याचे काम संवेदनशीलपणे केले जात आहे. देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची ही सरहदची भूमिका महत्वाची आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल लेह येथे आयोजिलेल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कारांच्या प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारगिलचे एक्झिक्युटिव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून घोषित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगा सैय्यद अब्बास रिझवी, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, डॉ. अपश्चिम बरंठ, डॉ. विजय कळमकर, डॉ. अनिल पाचणेकर, राकेश भान, वीरपत्नी उमा कुणाल गोसावी, डॉ. सतीश देसाई यांना वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बावीस वर्षांपूर्वी कारगिलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात, परंतु पुरस्काराचे महत्व पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेत. सरहद संस्थेच्या कार्याला नेहमीच सहकार्य राहील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

रिझवी म्हणाले, पुण्यात कारगिल विजयाबददल आज इतके भरभरून बोलले जात आहे, की जणू कारगिलमध्येच असल्यासारखे वाटत आहे. यापुढील काळात पुणे-कारगिल मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील लोकांनी कारगिलला भेट द्यावी, असे आवाहन करतो.

प्रास्ताविकात संजय नहार यांनी जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमधील शंभर मुलींना दत्तक घेणार आहे. सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. मिशनरी चळवळ म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले आणि संजीव शहा यांनी आभार मानले.

-------------------

प्रत्येक भारतीयाला कारगिल विजय दिवसाचा अभिमान वाटला पाहिजे. ‘लोकमत’ने कारगिल युद्धानंतर महाराष्ट्रातील सैनिकांच्या मुलांसाठी चार वसतीगृह निर्माण केली. ‘लोकमत’ने निधी जमा केला. यात समाजासह ‘लोकमत’ समूहाचेही योगदान होते. जे जे शहीद झाले, त्यांच्या घरी जाऊन या निधीमधील काही रक्कम दिली. याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे कारगिलशी नातं राहिलं आहे. हा पुरस्कार केवळ ‘लोकमत’चा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमे आणि प्रतिनिधींचा पुरस्कार असल्याचे मानतो.

- विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत

----------------------------