शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट मग ते अतिवृष्टी, कोरोना किंवा देशाच्या सीमेवर आलेले संकट असो ते दूर करण्याचे काम हे त्या त्या क्षेत्रातील सैनिक करीत असतात. कोणतेही काम हे प्रसिद्धीसाठी किंवा अपेक्षा न ठेवता करीत राहायचे, अशा भूमिकांमधूनच समाजासमोर आदर्श निर्माण होतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

सरहद्द संस्थेकडून कारगिल प्रदेशाशी जोडल्या गेलेल्या मुला-मुलींना पुण्यात आणून शिक्षण देण्याचे काम संवेदनशीलपणे केले जात आहे. देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची ही सरहदची भूमिका महत्वाची आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल लेह येथे आयोजिलेल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कारांच्या प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारगिलचे एक्झिक्युटिव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून घोषित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगा सैय्यद अब्बास रिझवी, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, डॉ. अपश्चिम बरंठ, डॉ. विजय कळमकर, डॉ. अनिल पाचणेकर, राकेश भान, वीरपत्नी उमा कुणाल गोसावी, डॉ. सतीश देसाई यांना वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बावीस वर्षांपूर्वी कारगिलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात, परंतु पुरस्काराचे महत्व पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेत. सरहद संस्थेच्या कार्याला नेहमीच सहकार्य राहील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

रिझवी म्हणाले, पुण्यात कारगिल विजयाबददल आज इतके भरभरून बोलले जात आहे, की जणू कारगिलमध्येच असल्यासारखे वाटत आहे. यापुढील काळात पुणे-कारगिल मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील लोकांनी कारगिलला भेट द्यावी, असे आवाहन करतो.

प्रास्ताविकात संजय नहार यांनी जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमधील शंभर मुलींना दत्तक घेणार आहे. सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. मिशनरी चळवळ म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले आणि संजीव शहा यांनी आभार मानले.

-------------------

प्रत्येक भारतीयाला कारगिल विजय दिवसाचा अभिमान वाटला पाहिजे. ‘लोकमत’ने कारगिल युद्धानंतर महाराष्ट्रातील सैनिकांच्या मुलांसाठी चार वसतीगृह निर्माण केली. ‘लोकमत’ने निधी जमा केला. यात समाजासह ‘लोकमत’ समूहाचेही योगदान होते. जे जे शहीद झाले, त्यांच्या घरी जाऊन या निधीमधील काही रक्कम दिली. याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे कारगिलशी नातं राहिलं आहे. हा पुरस्कार केवळ ‘लोकमत’चा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमे आणि प्रतिनिधींचा पुरस्कार असल्याचे मानतो.

- विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत

----------------------------