शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट मग ते अतिवृष्टी, कोरोना किंवा देशाच्या सीमेवर आलेले संकट असो ते दूर करण्याचे काम हे त्या त्या क्षेत्रातील सैनिक करीत असतात. कोणतेही काम हे प्रसिद्धीसाठी किंवा अपेक्षा न ठेवता करीत राहायचे, अशा भूमिकांमधूनच समाजासमोर आदर्श निर्माण होतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

सरहद्द संस्थेकडून कारगिल प्रदेशाशी जोडल्या गेलेल्या मुला-मुलींना पुण्यात आणून शिक्षण देण्याचे काम संवेदनशीलपणे केले जात आहे. देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची ही सरहदची भूमिका महत्वाची आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल लेह येथे आयोजिलेल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कारांच्या प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारगिलचे एक्झिक्युटिव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून घोषित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगा सैय्यद अब्बास रिझवी, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, डॉ. अपश्चिम बरंठ, डॉ. विजय कळमकर, डॉ. अनिल पाचणेकर, राकेश भान, वीरपत्नी उमा कुणाल गोसावी, डॉ. सतीश देसाई यांना वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बावीस वर्षांपूर्वी कारगिलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात, परंतु पुरस्काराचे महत्व पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेत. सरहद संस्थेच्या कार्याला नेहमीच सहकार्य राहील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

रिझवी म्हणाले, पुण्यात कारगिल विजयाबददल आज इतके भरभरून बोलले जात आहे, की जणू कारगिलमध्येच असल्यासारखे वाटत आहे. यापुढील काळात पुणे-कारगिल मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील लोकांनी कारगिलला भेट द्यावी, असे आवाहन करतो.

प्रास्ताविकात संजय नहार यांनी जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमधील शंभर मुलींना दत्तक घेणार आहे. सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. मिशनरी चळवळ म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले आणि संजीव शहा यांनी आभार मानले.

-------------------

प्रत्येक भारतीयाला कारगिल विजय दिवसाचा अभिमान वाटला पाहिजे. ‘लोकमत’ने कारगिल युद्धानंतर महाराष्ट्रातील सैनिकांच्या मुलांसाठी चार वसतीगृह निर्माण केली. ‘लोकमत’ने निधी जमा केला. यात समाजासह ‘लोकमत’ समूहाचेही योगदान होते. जे जे शहीद झाले, त्यांच्या घरी जाऊन या निधीमधील काही रक्कम दिली. याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे कारगिलशी नातं राहिलं आहे. हा पुरस्कार केवळ ‘लोकमत’चा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमे आणि प्रतिनिधींचा पुरस्कार असल्याचे मानतो.

- विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत

----------------------------