शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

‘लॉकडाऊन’मुळे ‘रोजी’ गेली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:10 IST

जिह्यात सुमारे ११ हजार २८३ जणांना मिळतोय लाभ पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले ...

जिह्यात सुमारे ११ हजार २८३ जणांना मिळतोय लाभ

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार वर्गांचे हाल होत आहेत. मात्र, सरकारने २ लाख शिवभोजन थाळी मोफत देण्याची व्यवस्था केल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. जेवणाचा मुख्य प्रश्न भागल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

कडक निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये, म्हणून एक महिनाभर रोज जवळपास २ लाख थाळ्या मोफत दिले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानुसार कामगारांना थाळीचा लाभ मिळत आहे.

बुधवारी १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून ते १ मेपर्यंत राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण झाली असती. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केल्याने अनेकांची रोजी बंद पडली आहे. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला.

------------------------

जिह्यात शिवभोजन थाळी केंद्र-

एकूण ९७ (शहरात २६, ग्रामीण भागात ७१)

दररोज घेतात लाभ -

एकूण ११, २८३ (शहरात ४,१२९, ग्रामीण भागात ७,१५४)

.........

थाळीचा लाभ घेणारे

मागच्या लॉकडाऊनपासून शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. थाळीमुळे जेवणाची चिंता मिटली आहे. काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सरकारने राबविलेली योजना चांगली आहे.

- दुर्गाराम भाटी

-----------------------

शहरात शिकण्यासाठी आलो आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद आहे. मूळ गावी न जाता डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे. पोटभर शिवभोजन थाळीमुळे चांगले जेवण मिळते. सध्या काम सुरू असले तरी तेवढ्या प्रमाणात रोजगार मिळत नाही.

-नीलकंठ वाघ

-----------------

काम नसल्यामुळे आर्थिक अडचण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळणे कठीण होऊन बसले आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता. आताही परिस्थिती तशीच होऊ लागली आहे. शिवभोजन थाळी मोफत मिळत असल्याने आधार मिळाला आहे.

-कोमल पट्टीवार

...........

११३ जणांना मिळतो

दररोज लाभ....

१) प्रत्येक केंद्राला थाळीची मर्यादा दिलेली आहे. आमच्या केंद्राला ७५ थाळीची मर्यादा होती. सद्य परिस्थितीत ११३ थाळींची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे.

२) काही केंद्रांना २१३ ते २३५ पर्यंत थाळ्यांची मर्यादा देण्यात आली आहे. शिवभोजन थाळीमुळे अनेकांचा जेवणाचा गंभीर प्रश्न सुटला आहे. दिवसेंदिवस थाळीला वाढता प्रतिसाद मिळत आहे. असे थाळी केंद्रचालक रोहित पाठारे यांनी सांगितले.

-----------------