शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

नदीकाठच्या रहिवाशांना धोका

By admin | Updated: July 16, 2017 03:49 IST

दरवर्षी पावसाळा सुरू होताच, महापालिकेतर्फे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जात असे़ आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देता

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : दरवर्षी पावसाळा सुरू होताच, महापालिकेतर्फे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जात असे़ आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देता यावी, यासाठी पूरनियंत्रण कक्ष सुरू केला जात असे. अलीकडच्या काळात महापालिकेला याचा विसर पडला असून नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास महापालिका प्रशासनाला ऐनवळी धावपळ करावी लागणार आहे.नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होताच, पूरनियंत्रण कक्ष स्थापून त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज होण्याची जबाबदारी सोपवली जात असे. नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केली जात असे. आता मात्र महापालिका प्रशासनाला याचे गांभीर्य राहिलेले नाही. पिंपरीत नदी काठी संजय गांधीनगर वसाहत आहे. नदीपात्रालगत झोपड्या आहेत. तसेच रहाटणी, दापोडी, सांगवी परिसरात नदीकाठी घरे आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर नदीपात्र दुथडी भरून वाहते. बांधकाम व्यावासायिकांनी नदीकाठी भराव टाकल्याने पात्र उथळ झाले आहे. मध्यंतरीच्या काळात पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी बंधारे फोडण्याचा प्रयोग महापालिकेने केला. मात्र त्यानंतर नदीपात्रालगत राडारोडा टाकणे सुरूच राहिले आहे. महापालिकेचे आपत्कालीन स्थितीशी सामना करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. असे नियोजन आणि कृती आराखडा दरवर्षी केला जात होता. त्यानुसार यंत्रणा मात्र कार्यन्वीत होत नव्हती, निदान नियोजन तरी केले जात होते. त्यामुळे महापालिकेने नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पवना धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण, धरणाच्या पाणी पातळीची स्थिती याची आकडेवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे रोजचे रोज अपडेट होत असे. त्यानुसार धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताच, महापालिका प्रशासन नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देत असे. सद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. जनजागृतीत कमी पडल्याची अधिकाऱ्याची कबुलीमहापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून नियोजन केले आहे. कृती आराखडा तयार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. असा दावा महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना तातडीक मदत कोणाकडून कशी मिळविता येईल, याची माहिती क्षेत्रिय कार्यालये, मुख्य प्रशासकीय इमारत येथे लावण्यात आलेली आहे. हेल्पलाइन क़्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात कमी पडल्याची कबुली आपत्कालीन कक्ष अधिकारी अनिल कदम यांनी दिली.