शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वाढत्या महागाईने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

वारंवार होणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीची चर्चा होत असते. मात्र कोरोना संकटापासून खाद्यतेलाच्या किमती जवळपास दुप्पट कधी झाल्या. त्यामुळे ...

वारंवार होणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीची चर्चा होत असते. मात्र कोरोना संकटापासून खाद्यतेलाच्या किमती जवळपास दुप्पट कधी झाल्या. त्यामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील पुढारीही खाद्यतेलाच्या वाढत्या बाजारभावाबद्दल आवाज उठवताना दिसत नाहीत.

खाद्यतेलामध्ये शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन आदी तेलांचा वापर करणाऱ्यांची संख्या देशात सर्वात जास्त आहे. तसेच मोहरी तेलाचाही वापर अनेक राज्यांत खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. मात्र, सर्वच खाद्यतेलाचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दुप्पट झाले आहेत. त्यामुळे ज्या घरात दरमहा पाच लिटर तेल वापरले जाते, त्या घरी दोन ते तीन लिटर तेल वापरण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना महामारीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर अनेकजण गावी परतले आहेत. लॉकडाउनच्या काळातच महागाई वाढत चालली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. लोकांना घरगुती खर्च भागविणेही कठीण जात आहे.

पेट्रोल ग्रामीण भागात १०० रूपये ९१ पैसे, डिझेल ९१ रूपये २४ पैसे, घरगती गॅस ८२० रूपये याबरोबरच खाद्यतेलाचेही दर दिवसेंदिवस वाढतच आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीने वाहनचालकांचे कंबरडे मोडल्याने, जीवनाश्यक वस्तूंचे भावसुद्धा वाढले आहे. किराणा मालातील अनेक वस्तूंचे भाव मागील एक वर्षात अनेक पटींनी वाढले आहेत. तेल, डाळीचे भाव गगनाला टेकले आहे. शेतमजूर महिलेला एक लिटर तेलाचा पुडा खरेदी करणाऱ्यांसाठी, तिला दिवसभर उन्हातान्हात घाम गाळून कमावलेल्या आख्ख्या एक दिवसाचा रोज एक लिटर तेलपुड्यासाठी द्यावा लागत आहे. गोरगरीब जनता कोरोना संकटामुळे अडचणीत आली असून, दररोज रोजगार मिळेल याची खात्री देखील नाही. यातच जीवनावश्यक वस्तूंची होत असलेल्या दरवाढीने, अगोदर बेजार झालेली जनता, वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीस आली आहे. त्यातच, डाळीचे भावसुद्धा कडाडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालेभाज्या, तेल, साखर, डाळ, अन्नधान्य महागल्याने गोरगरीब जनता कासावीस झाली असून, एक वेळच्या जेवणावरच उदरनिर्वाह करावा लागत आहे.

देशात पेट्रोल, डिझेलच्या किमतीने शंभरी गाठल्याने याचा परिणाम वाहतूकदारांवर झाला. वाहतुकीचे दर वाढले. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महागल्याने किराणा दुकानदार, व्यापाऱ्यांनी अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ केली. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही तर शेतीपयोगी मशागतीच्या कामाला सुरुवात झाली असून, महिलांना १०० ते २०० रुपये तर पुरुषांना २०० ते ३०० रुपये रोज मिळतो.

--

तेल असो हॉटेलमधील दाळ, शंभरची नोट पडते खर्ची

तेलाच्या किमतीमध्ये सोयाबीन तेल १५५ ते १७५ रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचले आहे. तुरीची डाळ ११० रुपये किलो, मिरचीपासून तर मसाल्याच्या पदार्थापर्यंत सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले. पालेभाज्यासुद्धा कडाडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगावे की मरावे, हा प्रश्न निर्माण झाला.

जेवणावळी, हॉटेल, धाब्यावर जेवण महागले असून, दाल फ्रायला १२० ते १३० रुपये मोजावे लागते.

--

कोट

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढले असून, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने व जीवनावश्यक सर्वच किराणा मालाचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढतच आहेत; त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यात किराणा मालाचे इतर वस्तूंचे दरही वाढले आहेत. गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्यांनी कसे जगावे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

संध्या नवले, गृहिणी, वाल्हे.

--

कोट -२

डिझेल दरवाढीमुळे वाहनमालकांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे किराणा वस्तूंचा वाहतूकखर्च वाढला आहे. त्याचबरोबर होलसेल माल खरेदी करताना गतवर्षीपेक्षा या वर्षी किराणा वस्तूंचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाईने, गिऱ्हाईक दुकानातील वस्तू खरेदी करण्यासाठी, कमी प्रमाणात येतात. जेमतेम माल खरेदी करीत आहेत.

- प्रसाद कुमठेकर, किराणा माल व्यावसायिक, वाल्हे.