शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाताचे आगर पावसाच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 15, 2016 04:51 IST

रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत.

डिंभे : रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेमुळे अजूनही निम्म्या अर्ध्या भातपेरण्या रखडल्या असून, जमिनीतील उष्णता वाढू लागल्याने पेरलेली भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरू झाली आहे. भातरोपांना पाटाचे पाणी देऊन रोपे वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. या भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती केली जाते. भातशेती हीच या शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेल, या आशेवर धूळवाफेवर भातपिकाची पेरणी करतात. या नक्षत्रात पाऊस झाल्यास रोहिणीची वाफ लागली. यंदा भातपीक चांगले येणार असा शेतकऱ्यांमध्ये संकेत आहे. यालाच रोहिणीची वाफ म्हणतात. रोहिणी नक्षत्राची वाफ लागल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठीही वेळेत होतात. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेलच या आशेवर जुने जाणते शेतकरी भातपिकाच्या पेरण्या करताना पाहावयास मिळतात. मात्र, यंदा रोहिणी नक्षत्र सरून मृगाचेही पाच ते सहा दिवस सरले तरी आकाशात ढगांचा ठिपूस दिसत नाही. रोहिणीत नाही तरी मृग नक्षत्र सुरू होताच पावसाला सुरुवात होईल या आशेवर काही शेतकऱ्यांनी रोहिणी सरताच धूळवाफेवर भातपेरण्या केल्या आहेत. मात्र, मृग नक्षत्रानेही पाठ फिरवल्याने झालेल्या भातपेरण्या संकटात सापडल्या आहेत. उगवून आलेल्या रोपांचे कोंब सुकू लागले असून, जमिनीतील दाणे कोठण्याची वेळ आली आहे. यामुळे ही रोपे पाटाचे पाणी, टँकरने पाणी देऊन वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे. पावसाची प्रामुख्याने भात उत्पादक शेतकरी आतुरतेने वाट पाहतोय. जर आणखी आठ दिवस पाऊस लांबला तर धुळवाफेवर केलेली पेरणी वाया जावू शकते. कृषी विभागाने भात बियानाची सुमारे ८0 टक्के विक्र्री आतापर्र्यत केली आहे.- सुनील खैैरनार, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद