शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

भाताचे आगर पावसाच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 15, 2016 04:51 IST

रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत.

डिंभे : रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत. पावसाच्या प्रतीक्षेमुळे अजूनही निम्म्या अर्ध्या भातपेरण्या रखडल्या असून, जमिनीतील उष्णता वाढू लागल्याने पेरलेली भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरू झाली आहे. भातरोपांना पाटाचे पाणी देऊन रोपे वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा व पुरंदर हे तालुके भातशेतीचे आगार समजले जातात. या भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती केली जाते. भातशेती हीच या शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे. दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेल, या आशेवर धूळवाफेवर भातपिकाची पेरणी करतात. या नक्षत्रात पाऊस झाल्यास रोहिणीची वाफ लागली. यंदा भातपीक चांगले येणार असा शेतकऱ्यांमध्ये संकेत आहे. यालाच रोहिणीची वाफ म्हणतात. रोहिणी नक्षत्राची वाफ लागल्यास भातरोपे वेळेत उगवून लागवडीसाठीही वेळेत होतात. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडेलच या आशेवर जुने जाणते शेतकरी भातपिकाच्या पेरण्या करताना पाहावयास मिळतात. मात्र, यंदा रोहिणी नक्षत्र सरून मृगाचेही पाच ते सहा दिवस सरले तरी आकाशात ढगांचा ठिपूस दिसत नाही. रोहिणीत नाही तरी मृग नक्षत्र सुरू होताच पावसाला सुरुवात होईल या आशेवर काही शेतकऱ्यांनी रोहिणी सरताच धूळवाफेवर भातपेरण्या केल्या आहेत. मात्र, मृग नक्षत्रानेही पाठ फिरवल्याने झालेल्या भातपेरण्या संकटात सापडल्या आहेत. उगवून आलेल्या रोपांचे कोंब सुकू लागले असून, जमिनीतील दाणे कोठण्याची वेळ आली आहे. यामुळे ही रोपे पाटाचे पाणी, टँकरने पाणी देऊन वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे. पावसाची प्रामुख्याने भात उत्पादक शेतकरी आतुरतेने वाट पाहतोय. जर आणखी आठ दिवस पाऊस लांबला तर धुळवाफेवर केलेली पेरणी वाया जावू शकते. कृषी विभागाने भात बियानाची सुमारे ८0 टक्के विक्र्री आतापर्र्यत केली आहे.- सुनील खैैरनार, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद