शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. तसेच राज्य मंडळाकडून लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. या निर्णयाचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परीक्षेच्या नियोजनासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली. त्यात दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची निर्णय घेतला. त्यामुळे या परीक्षा आता मे-जून महिन्यात होणार आहेत.

विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पाठवण्याबाबत पालकांच्या मनात भीतीचे वातावरण होते. तसेच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

--

शासन नियमानुसार दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच राज्य मंडळातर्फे परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,

--

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर जाताना दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असत्या. तसेच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली असती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शासनाने परीक्षा पुढे ढकलल्या. या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.

- दत्तात्रय पवार, पालक

---

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे होते. आता विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासाठी वेळ मिळाणार आहे. कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने एका दिवसात दोन-तीन विषयांच्या परीक्षा घ्याव्यात.

- मिलिंद शिंदे, पालक