शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व हवेलीतील ‘त्या’ प्रस्तावित पोलीस ठाण्याचा फेरविचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

उरुळी कांचन : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यानंतर, महाविकास आघाडी ...

उरुळी कांचन : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार, पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत समाविष्ट झालेल्या पूर्व हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर व लोणीकंद या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा फेरबदल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पुणे आयुक्तालयात समावेश असलेल्या व पूर्णतः ग्रामीणभागाशी नाळ जोडलेल्या उरुळी कांचन व परिसरातील गावांचा समावेश असलेले स्वतंत्र पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात अस्तित्वात आणण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, नाव छापून नका ही अट लावली जात आहे.

पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन्ही पोलीस स्टेशन २३ मार्च २०२१ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालयात समाविष्ट झाली असली, तरी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधून विभाजन करून उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव गृह विभागात प्रलंबित आहे. पूर्व हवेली तालुक्यातून संपूर्ण कार्यक्षेत्र शहरात समाविष्ट झाले असले तरी, शहरी पोलीस ठाण्यांचे एकूण क्षेत्रफळ, भौगोलिक रचना तसेच अति आवश्यक सेवा अगदी ५ मिनिटांत पुरविणे क्रमप्राप्त असताना या ठिकाणी काम

करताना याबाबी अशक्यप्राय बनल्याने, पुणे आयुक्तालयातील समावेशात त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

अशातच पूर्व हवेली तालुक्यातील या भागाला पूर्णतः हा भाग ग्रामीण नाळेशी जोडला आहे. शेती, शेतीजोड उद्योग धंदे, अवजड वाहतूक या ठिकाणी अनिवार्य आहे. अशा स्थितीत या ठिकाणी शहरी निर्बंध लावणे नागरिकांना अतिशय जुलमी व जिकिरीचे ठरू लागले आहे. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सीटबेल्टपासून वाहन परवाना वाहन पर्यावरण चाचणी अशा कायदा व नियमावर बोट दाखवून कार्यवाही सुरू असल्याने स्थानिक नागरिक या त्रासाने त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या कारवाई व दंडात्मक कारवाईने आधीच कोरोनाने पिचलेल्या व्यवसायावर बंधने पडू लागली आहेत.या सर्व तक्रारींबद्दल खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी समन्वयातून मार्ग काढू न शकल्याने त्यांच्यावरही नागरिकांचा रोष वाढू लागला आहे.

पुणे महानगरपालिकेप्रमाणे सत्तेचे पाठबळ मिळवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सत्ताधाऱ्यांना अडचणीच्या ठरू लागल्याने पोलिसांचा जाच कमी करण्यासाठी हद्दींचा फेरबदल होण्याचे वृत्त खात्रीशीरपणे चर्चेत आहे. शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यातील जो फरक आहे तो उरुळी कांचनसारख्या गावाने गेल्या चार महिन्यांपासून अनुभवला आहे व शहर पोलिसांमधील कोणत्याही तक्रारीची दखल न घेता अवैध धंदे बिनधास्त चालू ठेवण्यासाठी पाठबळ देण्याची पद्धत अनुभवलेली आहे. यामुळे या भागातील जनतेची भावना ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात राहण्याचीच झालेली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.