शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

पूर्व हवेलीतील ‘त्या’ प्रस्तावित पोलीस ठाण्याचा फेरविचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST

उरुळी कांचन : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यानंतर, महाविकास आघाडी ...

उरुळी कांचन : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार, पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत समाविष्ट झालेल्या पूर्व हवेली तालुक्यातील लोणीकाळभोर व लोणीकंद या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा फेरबदल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पुणे आयुक्तालयात समावेश असलेल्या व पूर्णतः ग्रामीणभागाशी नाळ जोडलेल्या उरुळी कांचन व परिसरातील गावांचा समावेश असलेले स्वतंत्र पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात अस्तित्वात आणण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र, नाव छापून नका ही अट लावली जात आहे.

पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन्ही पोलीस स्टेशन २३ मार्च २०२१ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालयात समाविष्ट झाली असली, तरी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधून विभाजन करून उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव गृह विभागात प्रलंबित आहे. पूर्व हवेली तालुक्यातून संपूर्ण कार्यक्षेत्र शहरात समाविष्ट झाले असले तरी, शहरी पोलीस ठाण्यांचे एकूण क्षेत्रफळ, भौगोलिक रचना तसेच अति आवश्यक सेवा अगदी ५ मिनिटांत पुरविणे क्रमप्राप्त असताना या ठिकाणी काम

करताना याबाबी अशक्यप्राय बनल्याने, पुणे आयुक्तालयातील समावेशात त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

अशातच पूर्व हवेली तालुक्यातील या भागाला पूर्णतः हा भाग ग्रामीण नाळेशी जोडला आहे. शेती, शेतीजोड उद्योग धंदे, अवजड वाहतूक या ठिकाणी अनिवार्य आहे. अशा स्थितीत या ठिकाणी शहरी निर्बंध लावणे नागरिकांना अतिशय जुलमी व जिकिरीचे ठरू लागले आहे. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सीटबेल्टपासून वाहन परवाना वाहन पर्यावरण चाचणी अशा कायदा व नियमावर बोट दाखवून कार्यवाही सुरू असल्याने स्थानिक नागरिक या त्रासाने त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या कारवाई व दंडात्मक कारवाईने आधीच कोरोनाने पिचलेल्या व्यवसायावर बंधने पडू लागली आहेत.या सर्व तक्रारींबद्दल खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी समन्वयातून मार्ग काढू न शकल्याने त्यांच्यावरही नागरिकांचा रोष वाढू लागला आहे.

पुणे महानगरपालिकेप्रमाणे सत्तेचे पाठबळ मिळवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सत्ताधाऱ्यांना अडचणीच्या ठरू लागल्याने पोलिसांचा जाच कमी करण्यासाठी हद्दींचा फेरबदल होण्याचे वृत्त खात्रीशीरपणे चर्चेत आहे. शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यातील जो फरक आहे तो उरुळी कांचनसारख्या गावाने गेल्या चार महिन्यांपासून अनुभवला आहे व शहर पोलिसांमधील कोणत्याही तक्रारीची दखल न घेता अवैध धंदे बिनधास्त चालू ठेवण्यासाठी पाठबळ देण्याची पद्धत अनुभवलेली आहे. यामुळे या भागातील जनतेची भावना ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात राहण्याचीच झालेली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.