शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

प्रथम वर्षाचा निकाल विद्यापीठानेच तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:11 IST

विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांची संख्या सुमारे १ हजार आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय ...

विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांची संख्या सुमारे १ हजार आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अनेक अडचणी येत होत्या. परिणामी २००८-०९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने महाविद्यालयांनीच प्रथम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करून निकाल जाहीर करावा, असा निर्णय घेतला. परंतु, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासह पदवी अभ्यासक्रमासाठी सुद्धा चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम पॅटर्न लागू करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या निकालावर तीनही वर्षांच्या परीक्षेच्या गुणांचा उल्लेख असावा, असा निर्णय न्यायालयाने दिला.

संलग्न महाविद्यालयांकडे चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टिमनुसार पदवी अभ्यासक्रमाचा निकाल तयार करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचा निकाल तयार करून तो महाविद्यालयांकडे पाठविला जात होता. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत प्रथम वर्षाच्या परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम महाविद्यालयांकडे द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------

अद्याप कोणतेही प्रशिक्षण नाही दिले

महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिमनुसार निकाल तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण अद्याप दिले गेले नाही. विद्यापीठाने अचानक निर्णय जाहीर केल्यामुळे महाविद्यालयांना सुद्धा याबाबत तयारी करण्यास वेळ मिळाला नाही. निकाल जाहीर करताना काही त्रुटी किंवा चुका राहिल्या तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने पूर्वीप्रमाणे निकाल तयार करून विद्यापीठाकडे पाठवावा, अशी विनंती प्राचार्य महासंघातर्फे निवेदनाद्वारे विद्यापीठाला करण्यात आली आहे.